ETV Bharat / state

'विकासकामं करताना नाशिकचं सौंदर्यपण टिकणं गरजेचं'

author img

By

Published : Dec 26, 2019, 8:09 PM IST

महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकांना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले, असेही भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal
छगन भुजबळ

नाशिक - २०१४ पूर्वी देखील जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली. ती कामे यापुढील काळातही सुरू राहतील. त्यामुळे कुठल्याही विकासकामांना माझा विरोध नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प आणि योजना राबविल्या गेल्या पाहिजे. कारण, नागपूरची मेट्रो जाम झाली, मुंबईची मोनोरेल फसली त्यामुळे नाशिकचा विकास करताना येथील सौंदर्य आणि नाशिकपन टिकले पाहिजे, असे मत राज्याचे ग्रामविकास अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी सर्वांना सोबत घेऊन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मी विरोध करणारा नाही तर विकास करणारा असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठामंत्री

यावेळी भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकांना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या दिलेल्या कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच शिवभोजन थाळीचा प्रकल्प राज्यात सुरू करण्यात आला आहे. तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे आहे. तसेच मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यामुळे जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आले. त्यामुळे जिल्हा स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा - आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांच्या मराठा वृत्तपत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा सामना यांनी महत्त्वाची भूमिका राबविली, असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, सत्तेपेक्षा विरोधात राहून किती फायदा होतो, असे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजविण्याची गरज आहे. त्यामुळे हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, असा चिमटा त्यांनी काढला. विकास कामांसाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. दिल्लीत जेवढी सदन आहेत, त्या सर्वांमध्ये छगन भुजबळ यांनी बांधलेलं महाराष्ट्र सदन हे सर्वाधिक उठून दिसते. त्यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधींनी कामे करताना भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा - 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'

यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ.नरेश गीते, मुख्याधिकारी एस.भुवनेश्वरी, आदी उपस्थित होते.

नाशिक - २०१४ पूर्वी देखील जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली. ती कामे यापुढील काळातही सुरू राहतील. त्यामुळे कुठल्याही विकासकामांना माझा विरोध नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प आणि योजना राबविल्या गेल्या पाहिजे. कारण, नागपूरची मेट्रो जाम झाली, मुंबईची मोनोरेल फसली त्यामुळे नाशिकचा विकास करताना येथील सौंदर्य आणि नाशिकपन टिकले पाहिजे, असे मत राज्याचे ग्रामविकास अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तसेच यासाठी सर्वांना सोबत घेऊन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मी विरोध करणारा नाही तर विकास करणारा असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

छगन भुजबळ, अन्न नागरी पुरवठामंत्री

यावेळी भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकांना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या दिलेल्या कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच शिवभोजन थाळीचा प्रकल्प राज्यात सुरू करण्यात आला आहे. तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे आहे. तसेच मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यामुळे जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आले. त्यामुळे जिल्हा स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविले जाऊ लागले आहेत.

हेही वाचा - आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांच्या मराठा वृत्तपत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा सामना यांनी महत्त्वाची भूमिका राबविली, असेही ते म्हणाले. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, सत्तेपेक्षा विरोधात राहून किती फायदा होतो, असे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजविण्याची गरज आहे. त्यामुळे हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, असा चिमटा त्यांनी काढला. विकास कामांसाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. दिल्लीत जेवढी सदन आहेत, त्या सर्वांमध्ये छगन भुजबळ यांनी बांधलेलं महाराष्ट्र सदन हे सर्वाधिक उठून दिसते. त्यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधींनी कामे करताना भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा - 'देशाच्या इतिहासातील वाईट काळ, स्थापनादिनी काँग्रेस काढणार संविधान बचाव रॅली'

यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ.नरेश गीते, मुख्याधिकारी एस.भुवनेश्वरी, आदी उपस्थित होते.

Intro:सन २०१४ पूर्वी देखील नाशिक जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली. ती कामे यापुढील काळातही सुरू राहतील. त्यामुळे कुठल्याही विकास कामांना माझा विरोध नसून तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प व योजना राबविल्या गेल्या पाहिजे. कारण नागपूरची मेट्रो जाम झाली, मुंबईची मेनोरेल फसली त्यामुळे नाशिकचा विकास करतांना नाशिकच सौदर्य नाशिकच नाशिकपन टिकलं पाहिजे यासाठी सर्वांना सोबत घेऊन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मी विरोध करणारा नाही तर विकास करणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, अन्न आणि औषध प्रशासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Body:यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेल्या कर्जमाफीतून नाशिक जिल्ह्यात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दीड लाख खातेधारकाना होणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्यात ६५० कोटी रुपये आले मात्र प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या दिलेल्या कर्ज माफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच शिवभोजन थाळीचा पायलट प्रोजेक्ट राज्यात सुरू करण्यात आला असून तो यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.. मंत्रालयातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्यामुळे जिल्ह्याचे स्थानिक प्रश्न सोडविण्याचेे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आले. त्यामुळे जिल्हा स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविले जाऊ लागले असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच महाविकास आघाडीचे सरकार उभे करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांचा सामना यांनी आपली महत्वाची भूमिका राबविली असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की, सद्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजविण्याची गरज आहे की सत्ते पेक्षा विरोधात राहून किती फायदा होतो. त्यामुळे हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल असा चिमटा त्यांनी काढला.
ते म्हणाले की,विकासाच्या कामासाठी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधींनी विकास कामे करतांना छगन भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे कारण देशाची राजधानीअसलेल्या दिल्लीत जेवढी सदन आहे त्या सर्वांमध्ये छगन भुजबळ यांनी बांधलेलं महाराष्ट्र सदन हे सर्वाधिक उठून दिसतं.अस काम करणारे छगन भुजबळ हे एकमेव नेते असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेची इमारत ठरलेल्या बजेट मध्ये वर्षभरात उत्तम प्रकारे उभी राहील आणि त्याचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील तसेच नाशिकच्या विविध विकास कामासाठी उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये आणण्याची जबाबदारी छगन भुजबळ यांची असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Conclusion:यावेळी खासदार संजय राऊत, माजी मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, डॉ.नरेश गीते, मुख्याधिकारी एस.भुवनेश्वरी, जिल्हा परिषद शीतल सांगळे, उदय जाधव, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.