ETV Bharat / state

कुलभूषण जाधवांची केस पाकिस्तानच्या सामान्य न्यायालयात चालवावी - निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर - कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती मिळाली असली तरी पुढील महिन्याभरात त्यांची भारतात येण्याची शक्यता नाही. त्यांची पुन्हा पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टात मोठ्या प्रमाणत चौकशी केली जाणार आहे. जाधव हे निवृत्त लष्कर अधिकारी असले तरी ते आता सामान्य नागरिक आहेत. त्यामुळे त्यांची केस सामान्य न्यायालयात चालवायला पाहिजे असे निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर म्हणाले.

अजित ओढेकर
author img

By

Published : Jul 18, 2019, 11:58 AM IST

नाशिक - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने लागला. त्यांच्या केसचा पुनर्विचार होणे आणि त्यांच्या फाशीला स्थगिती मिळणे हा भारताचा नैतिक विजय असल्याचे मत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केले आहे.

निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर कुलभूषण जाधव यांच्या केसबाबत बोलताना


पाकिस्तानने भारताविरोधात षडयंत्र रचले असून, पाकिस्तान हा दहशतवादी पुरस्कृत देश आहे. तसेच काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानने प्रोत्साहन दिल्याचे भारताने जगभरात उघड केले. म्हणून भारताला कोंडीत पकडण्यासाठी कुलभूषण हे हेरगिरी करत असल्याचे म्हणत त्यांना ताब्यात घेतल्याचे कॅप्टन अजित ओढेकर यांनी सांगितले.

महिनाभरात कुलभूषण जाधव भारतात परतण्याची शक्यता नाही

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला मिळालेली स्थगिती हा जरी मोठा निर्णय असला तरी पुढील महिन्याभरात कुलभूषण यांची भारतात येण्याची शक्यता नाही. त्यांची पुन्हा पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टात मोठ्या प्रमाणत चौकशी केली जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा लावून धरला पाहिजे की, कुलभूषण जाधव हे निवृत्त लष्कर अधिकारी असले तरी ते आता सामान्य नागरिक आहेत. जशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्था आहे तशाच पद्धतीने कुलभूषण जाधव यांची सामान्य न्यायालयात केस चालवली पाहिजे. भारतातसुद्धा दहशतवादी पकडल्यानंतर त्यांची केस मिलीटरी कोर्टात न चालवता सामान्य न्यायालयात चालवली जाते. जर पाकिस्तानने असे केले तर सत्य बाहेर येईल आणि कुलभूषण जाधव हे निर्दोष सुटतील, असा विश्वासही निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक - कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल भारताच्या बाजूने लागला. त्यांच्या केसचा पुनर्विचार होणे आणि त्यांच्या फाशीला स्थगिती मिळणे हा भारताचा नैतिक विजय असल्याचे मत निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केले आहे.

निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर कुलभूषण जाधव यांच्या केसबाबत बोलताना


पाकिस्तानने भारताविरोधात षडयंत्र रचले असून, पाकिस्तान हा दहशतवादी पुरस्कृत देश आहे. तसेच काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानने प्रोत्साहन दिल्याचे भारताने जगभरात उघड केले. म्हणून भारताला कोंडीत पकडण्यासाठी कुलभूषण हे हेरगिरी करत असल्याचे म्हणत त्यांना ताब्यात घेतल्याचे कॅप्टन अजित ओढेकर यांनी सांगितले.

महिनाभरात कुलभूषण जाधव भारतात परतण्याची शक्यता नाही

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला मिळालेली स्थगिती हा जरी मोठा निर्णय असला तरी पुढील महिन्याभरात कुलभूषण यांची भारतात येण्याची शक्यता नाही. त्यांची पुन्हा पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टात मोठ्या प्रमाणत चौकशी केली जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा लावून धरला पाहिजे की, कुलभूषण जाधव हे निवृत्त लष्कर अधिकारी असले तरी ते आता सामान्य नागरिक आहेत. जशी आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्था आहे तशाच पद्धतीने कुलभूषण जाधव यांची सामान्य न्यायालयात केस चालवली पाहिजे. भारतातसुद्धा दहशतवादी पकडल्यानंतर त्यांची केस मिलीटरी कोर्टात न चालवता सामान्य न्यायालयात चालवली जाते. जर पाकिस्तानने असे केले तर सत्य बाहेर येईल आणि कुलभूषण जाधव हे निर्दोष सुटतील, असा विश्वासही निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी व्यक्त केला आहे.

Intro:कुलभूषण जाधव यांची केस पाकिस्तानच्या सामान्य न्यायालयात चालवावी -निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर


Body:कुलभूषण जाधव यांच्या केसचा पुनर्विचार होणे आणि
त्यांच्या फाशीला स्थगिती मिळनं हा भारताचा नैतिक विजय असल्याचे निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी म्हटलं आहे,

पाकिस्तानने भारता विरोधात षड्यंत्र रचल असून,पाकिस्तान देश आतंकवादी पुरस्कृत देश असून भारतातील काश्मीर मध्ये होणाऱ्या आतंकवादी कारवाईना प्रोत्साहन दिल्याचे भारताने देशभरात उघड केलं आणि म्हणून भारताला कोंडीत पकडण्यासाठी कुलभूषण हे हेरगिरी करत असल्याचे म्हणत त्यांना ताब्यात घेतल्याचे कॅप्टन अजित ओढेकर यांनी सांगितलं..कुलभूषण जाधव यांची फाशीला जरी स्थगिती मिळाली हा जरी मोठा निर्णय असला तरी पुढील महिन्याभरात कुलभूषण भारत येतील हे शक्य नसून,त्यांची पुन्हा पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टात मोठ्या प्रमाणत चौकशी केली जाणार आहे..भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा लावून धरला पाहिजे की, कुलभूषण जाधव हे निवृत्ती लष्कर अधिकारी असले तरी ते आता सामान्य नागरिक आहेत,जस आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवस्था आहे तशी पद्धतीने कुलभूषण जाधव यांची सामान्य न्यायालयात केस चालवाली पाहिजे...भारतात सुद्धा आतंकवादी पकडल्या नंतर त्यांची केस मिलीटरी कोर्टात नं चालवत सामान्य कोर्टात चालवली जाते ,जर पाकिस्तान ने असे केले तर सत्य बाहेर, येईल आणि कुलभूषण जाधव हे निर्दोष सुटेल असा विश्वास निवृत्त कॅप्टन अजित ओढेकर यांनी म्हंटल आहे..

टीप फीड ftp
nsk captain odhekar byte 1
nsk captain odhekar byte 1


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.