ETV Bharat / state

नंदुरबार शहराला एक ऑगस्टपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा - आमदार चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. तसेच पुढच्या काळात कसा पाऊस होईल याची शाश्वती नाही. यामुळे नंदुरबार पालिकेला नाईलाजाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

author img

By

Published : Jul 29, 2019, 2:11 PM IST

विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक

नंदुरबार - गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'विरचक' धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे नंदुरबार वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यंदा पावसाळा सुरू झाला, पण पावसात मोठा खंड पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक


नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. तसेच पावसाळ्याचे दोन महिने संपत आले, तरीही प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण विरचक धरणात पाणीसाठा करणारी शिवन नदी अजूनही प्रवाही झालेली नाही. तसेच पुढच्या काळात कसा पाऊस होईल याची शाश्वती नाही. यामुळे नंदुरबार पालिकेला नाईलाजाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

नंदुरबार - गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'विरचक' धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे नंदुरबार वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यंदा पावसाळा सुरू झाला, पण पावसात मोठा खंड पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक


नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आता केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. तसेच पावसाळ्याचे दोन महिने संपत आले, तरीही प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पण विरचक धरणात पाणीसाठा करणारी शिवन नदी अजूनही प्रवाही झालेली नाही. तसेच पुढच्या काळात कसा पाऊस होईल याची शाश्वती नाही. यामुळे नंदुरबार पालिकेला नाईलाजाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

Intro:Anchor :- गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता त्यामुळे नंदुरबार वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच यंदाही पावसाळा सुरू होऊनही पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाईत वाढ झाली आहे. Body:नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात आज अखेर केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे तसेच पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीही प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे परंतु विरचक धरणात पाणीसाठा जमा करणाऱ्या शिवन नदीला अजूनही प्रवाह सुरू झालेला नाही तसेच पुढच्या दोन महिन्यात पाऊस कसा होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे नंदुरबार पालिकेला नाईलाजाने आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
Conclusion:Byte :- चंद्रकांत रघुवंशी आमदार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.