ETV Bharat / state

'कोरोना रुग्णांच्या संपर्क साखळीतील व्यक्तींच्या वैद्यकीय तपासणीवर भर द्या'

खासदार डॉ. हिना गावीत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला जावा. जास्त जोखमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात यावेत, असे निर्देश खासदार गावीत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

author img

By

Published : Apr 29, 2020, 11:47 AM IST

MP Dr. Heena Gavit
खासदार डाॅ. हिना गावीत

नंदुरबार - कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला जावा. जास्त जोखमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात यावेत, असे निर्देश खासदार डॉ. हिना गावीत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. हिना गावीत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली

राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने द्यावी. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी, अशा सुचनाही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना केल्या.

जिल्ह्यात 5 व्हेंटीलेटर असून आणखी 10 व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझर आणि एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या बैठकीत दिली.

मनरेगाच्या माध्यमातून 282 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून 8 हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 40 टक्के पूर्ण झाले आहे. यावर्षीही विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते 80 ते 90 टक्क्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत एकाही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यांच्या आणि रुग्णालयांच्या दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून नियमांचे पालन न करणाऱ्या 4 रास्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या मजूरांना आपल्या गावात क्वारंटाईन करावे. यासाठी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींची संख्या वाढवावी. नागरिकांना अन्नधान्य नियमानुसार योग्य प्रमाणात मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे डॉ. विजयकुमार गावीत यांनी अधिकाऱयांना सांगितले.

जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून पोलिसांना सुरक्षा कीट आणि सॅनिटायझर देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली. बचत गटातील महिलांद्वारे 12 हजार मास्क बनवण्यात आले असून त्यांचे आशा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. या बैठकीला कृषी, रोजगार हमी योजना, बँक, सहकार, बांधकाम या विभागांचेही अधिकारी उपस्थित होते.

नंदुरबार - कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला जावा. जास्त जोखमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात यावेत, असे निर्देश खासदार डॉ. हिना गावीत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. हिना गावीत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली

राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने द्यावी. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतील गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी, अशा सुचनाही त्यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना केल्या.

जिल्ह्यात 5 व्हेंटीलेटर असून आणखी 10 व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझर आणि एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या बैठकीत दिली.

मनरेगाच्या माध्यमातून 282 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून 8 हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 40 टक्के पूर्ण झाले आहे. यावर्षीही विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते 80 ते 90 टक्क्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत एकाही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यांच्या आणि रुग्णालयांच्या दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून नियमांचे पालन न करणाऱ्या 4 रास्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या मजूरांना आपल्या गावात क्वारंटाईन करावे. यासाठी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींची संख्या वाढवावी. नागरिकांना अन्नधान्य नियमानुसार योग्य प्रमाणात मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे डॉ. विजयकुमार गावीत यांनी अधिकाऱयांना सांगितले.

जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून पोलिसांना सुरक्षा कीट आणि सॅनिटायझर देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली. बचत गटातील महिलांद्वारे 12 हजार मास्क बनवण्यात आले असून त्यांचे आशा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. या बैठकीला कृषी, रोजगार हमी योजना, बँक, सहकार, बांधकाम या विभागांचेही अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.