ETV Bharat / state

BRS Debut Maharshtra : महाराष्ट्रातून बीआरएसचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश, ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये के. चंद्रशेखर राव यांचा पहिला संवाद मेळावा

author img

By

Published : Feb 3, 2023, 11:10 AM IST

तेलंगणातील बीआरएस पक्ष भारत राष्‍ट्र समिती नांदेडमधून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने पक्षवाढीसाठी बीआरएस नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यात लक्ष केंद्रित केले आहे. नांदेडमध्ये मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत. तिथल्या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्याही मोठी आहे.

BRS Debut Maharshtra
बीआरएस नांदेडमधून राष्ट्रीय राजकारणात

बीआरएस नांदेडमधून राष्ट्रीय राजकारणात

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येत्या ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणाबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असेल. याची जय्यत तयारी सुरू आहे. बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या संवाद मेळाव्याची जागा गुरुद्वारा मैदानावर निश्चित झाली आहे. या वेळी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर पक्षाची जिल्हा, विभाग व राज्याची कार्यकारिणी ठरणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सीमावर्ती तालुक्यांमध्ये बैठका सुरू आहेत.


तेलगू भाषिकांची संख्याही मोठी : बिलोली, देगलूर, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर हे तालुके तेलंगणाच्या सीमेला जोडलेले आहेत. या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्याही मोठी आहे. त्यांचे रोजचे जाणे-येणे तेलंगणात आहे. तेलंगणातील सोयी-सुविधांकडे आकर्षित होऊन सीमेलगतची बहुतांश गावे तेलंगणात जाण्यासाठी इच्छुक आहेत. हाच धागा पकडून बीआरएसने महाराष्‍ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. काही सीमावर्ती तालुक्यात बैठकाही सुरू आहेत. या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत.


तेलंगणातील बसेसची संख्या वाढवल्या : सीमावर्ती असलेल्या हिमायतनगर येथे मागील दोन महिन्यांपासून तेलंगणा एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवण्यात आली. पूर्वी म्हैसा डेपोच्या दोन बस हिमायतनगर येथे येत होत्या. आता सहा बसमध्ये वाढ करण्यात येऊन त्या निर्मल, म्हैसा, हिमायतनगर, उमरखेड, ढालकीपर्यंत जात आहेत. विशेष म्हणजे या बसेसला महाराष्‍ट्र एसटी बसच्या तुलनेत ५ टक्के तिकीट दर कमी आहे. बससंख्या वाढवून प्रवाशांना एक प्रकारे लुभावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्वी सहा बस येत होत्या. परंतु किनवट-नांदेड एकच बस सुरू आहे.

आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटींचे सत्र सुरू : वनमंत्री आणि कायदा मंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी २९ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यासाठी तेलंगणा राज्याचे वनमंत्री व कायदामंत्री ए. इंद्रकरण रेड्डी हे नांदेड दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पवित्र सचखंड गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळाची पाहणी केली. कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा व उज्ज्वल भारत निर्माण करण्यासाठी केसीआर यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : BRS Nanded: नांदेडची धुरा कुणाकडे येणार? माजी लोकप्रतिनिधींसह सरपंचही लागले 'बीआरएस'च्या गळाला

बीआरएस नांदेडमधून राष्ट्रीय राजकारणात

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येत्या ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये संवाद मेळावा घेणार आहेत. तेलंगणाबाहेर त्यांचा हा पहिलाच मेळावा असेल. याची जय्यत तयारी सुरू आहे. बीआरएसच्या नेत्यांनी नांदेडमध्ये आजी, माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेऊन त्यांना बीआरएसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले जात आहे. मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांच्या संवाद मेळाव्याची जागा गुरुद्वारा मैदानावर निश्चित झाली आहे. या वेळी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर पक्षाची जिल्हा, विभाग व राज्याची कार्यकारिणी ठरणार आहे, असे संयोजकांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी सीमावर्ती तालुक्यांमध्ये बैठका सुरू आहेत.


तेलगू भाषिकांची संख्याही मोठी : बिलोली, देगलूर, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर हे तालुके तेलंगणाच्या सीमेला जोडलेले आहेत. या तालुक्यांमध्ये तेलगू भाषिकांची संख्याही मोठी आहे. त्यांचे रोजचे जाणे-येणे तेलंगणात आहे. तेलंगणातील सोयी-सुविधांकडे आकर्षित होऊन सीमेलगतची बहुतांश गावे तेलंगणात जाण्यासाठी इच्छुक आहेत. हाच धागा पकडून बीआरएसने महाराष्‍ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. काही सीमावर्ती तालुक्यात बैठकाही सुरू आहेत. या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली जात आहे. तसेच मागील आठवड्यापासून तेलंगणातील विद्यमानसह माजी लोकप्रतिनिधी तळ ठोकून आहेत. याशिवाय मंत्र्यांचे दौरेही वाढले आहेत.


तेलंगणातील बसेसची संख्या वाढवल्या : सीमावर्ती असलेल्या हिमायतनगर येथे मागील दोन महिन्यांपासून तेलंगणा एसटी महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवण्यात आली. पूर्वी म्हैसा डेपोच्या दोन बस हिमायतनगर येथे येत होत्या. आता सहा बसमध्ये वाढ करण्यात येऊन त्या निर्मल, म्हैसा, हिमायतनगर, उमरखेड, ढालकीपर्यंत जात आहेत. विशेष म्हणजे या बसेसला महाराष्‍ट्र एसटी बसच्या तुलनेत ५ टक्के तिकीट दर कमी आहे. बससंख्या वाढवून प्रवाशांना एक प्रकारे लुभावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्वी सहा बस येत होत्या. परंतु किनवट-नांदेड एकच बस सुरू आहे.

आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटींचे सत्र सुरू : वनमंत्री आणि कायदा मंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी २९ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यासाठी तेलंगणा राज्याचे वनमंत्री व कायदामंत्री ए. इंद्रकरण रेड्डी हे नांदेड दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी पवित्र सचखंड गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळाची पाहणी केली. कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा व उज्ज्वल भारत निर्माण करण्यासाठी केसीआर यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा : BRS Nanded: नांदेडची धुरा कुणाकडे येणार? माजी लोकप्रतिनिधींसह सरपंचही लागले 'बीआरएस'च्या गळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.