ETV Bharat / state

Nana Patole Criticized BJP : दुसऱ्यांचे घर फोडताना भाजपला आनंद, त्यांचे घर फुटेल तेव्हा दुःख कळेल - नाना पटोले

author img

By

Published : Jan 13, 2023, 3:33 PM IST

दुसऱ्यांचे घर फोडताना भाजपला आनंद होतो. मात्र जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना दुःख कळेल, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नाना पटोले नागपूरमध्ये बोलत होते. काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला जाणार नाही असे आज नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. भाजप भीती दाखवून घरे फोडण्याची काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

nana patole
नाना पटोले
प्रतिक्रिया देताना नाना पटोले

नागपूर : विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात काल नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे काँग्रेस पक्षाची गोची झाली आहे. ऐनवेळी अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणार काँग्रेसचा उमेदवारच राहिलेला नाही. यासर्व घडामोडीची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला कळवली आहे. काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार सत्यजित तांबेला पाठिंबा दिला जाणार नाही असे आज नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. सुधीर तांबेनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. भाजप भीती दाखवून घरे फोडण्याची काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हायकमांडला माहिती दिली : नाशिकमध्ये जे झाले त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्याचा आज निर्णय होईल. काँग्रेसने सत्यजित तांबेला समर्थन दिले नाही. डॉ सुधीर तांबे कालपर्यंत बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात होते. या घटनाक्रमानंतर ते आमच्या संपर्कात नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणाले आहेत. तांबे यांनी दगा फटका केला असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तेव्हा भाजपला कळेल : भाजपवर भाष्य करताना नाना पोटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याचे दुःख कळेल असा टोला नाना पटोले यांनी लावला आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत चमत्कार होऊ शकतो, असे मोठे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. सत्यजित तांबे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर स्वागतच आहे, असे विधानही विखे पाटील यांनी केले होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा : राज्यात आजपासून सुरु झालेल्या एमपीएससी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना सभागृहात घेरण्याची रणनीती तयार केली आहे. सरकार गरीब विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यापासून रोखत असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

लोकशाही संपुष्टात : भारतातली लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप सातत्याने करते आहे. असे पटोले यांनी काल अमरावतीत म्हटले. संजय गांधी निराधार योजनेतून राज्यातील निराधारांना मिळणारा आधार आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देण्याचा दुर्दैवी निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे असे त्यांनी म्हटले. अमरावती जिल्ह्याचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्फण या संस्थेला हा कंत्राट देण्यात आले आहे, त्यावर नाना पटोलेंनी भाष्य केले.

हेही वाचा :Cm Eknath Shinde on Davos trip : दावोसच्या दौऱ्यात गुंतवणुकीचे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार- एकनाथ शिंदे

प्रतिक्रिया देताना नाना पटोले

नागपूर : विधानपरिषद पदवीधर नाशिक मतदारसंघात काल नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे काँग्रेस पक्षाची गोची झाली आहे. ऐनवेळी अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे आता निवडणूकीच्या रिंगणार काँग्रेसचा उमेदवारच राहिलेला नाही. यासर्व घडामोडीची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला कळवली आहे. काँग्रेसकडून बंडखोर उमेदवार सत्यजित तांबेला पाठिंबा दिला जाणार नाही असे आज नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. सुधीर तांबेनी पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. भाजप भीती दाखवून घरे फोडण्याची काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

हायकमांडला माहिती दिली : नाशिकमध्ये जे झाले त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्याचा आज निर्णय होईल. काँग्रेसने सत्यजित तांबेला समर्थन दिले नाही. डॉ सुधीर तांबे कालपर्यंत बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात होते. या घटनाक्रमानंतर ते आमच्या संपर्कात नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हणाले आहेत. तांबे यांनी दगा फटका केला असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.

तेव्हा भाजपला कळेल : भाजपवर भाष्य करताना नाना पोटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याचे दुःख कळेल असा टोला नाना पटोले यांनी लावला आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत चमत्कार होऊ शकतो, असे मोठे वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. सत्यजित तांबे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर स्वागतच आहे, असे विधानही विखे पाटील यांनी केले होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा : राज्यात आजपासून सुरु झालेल्या एमपीएससी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना सभागृहात घेरण्याची रणनीती तयार केली आहे. सरकार गरीब विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यापासून रोखत असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

लोकशाही संपुष्टात : भारतातली लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप सातत्याने करते आहे. असे पटोले यांनी काल अमरावतीत म्हटले. संजय गांधी निराधार योजनेतून राज्यातील निराधारांना मिळणारा आधार आता एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून देण्याचा दुर्दैवी निर्णय राज्यातील भाजप सरकारने घेतला आहे असे त्यांनी म्हटले. अमरावती जिल्ह्याचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्फण या संस्थेला हा कंत्राट देण्यात आले आहे, त्यावर नाना पटोलेंनी भाष्य केले.

हेही वाचा :Cm Eknath Shinde on Davos trip : दावोसच्या दौऱ्यात गुंतवणुकीचे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार- एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.