ETV Bharat / state

अपुऱ्या पावसामुळे नागपूरकरांवर पाणी कपातीची मार

author img

By

Published : Jul 16, 2019, 9:09 AM IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि पेंच प्रकल्पातील पाणी साठा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागपूर शहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.

विजय झलके, पाणी पुरवठा सभापती , नागपूर महानगर पालिका

नागपूर - विदर्भावर वरूण राजा रुसल्याने नागपूर शहरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. पावसाळ्यात पाणी कमतरतेचे संकट ओढवल्याने शहर महापालिकेच्या जलप्रदाय समितीने आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरकरांना मोठी समस्या होणार आहे.

माहिती देताना विजय झलके, पाणी पुरवठा सभापती , नागपूर महानगर पालिका

देशासहित राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरु आहे. मात्र, विदर्भासह नागपूरवर वरूण राजा कोपल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि पेंच प्रकल्पातील पाणी साठा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागपूर शहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. पाणी कमतरतेमुळे पालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या समस्येत भर पडणार असल्याची शक्यता आहे. सध्या शहरात ऐतिहासिक पाणी टंचाई असून इतिहासात पाहिल्यांदाच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. मात्र, आगामी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

नागपूर - विदर्भावर वरूण राजा रुसल्याने नागपूर शहरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. पावसाळ्यात पाणी कमतरतेचे संकट ओढवल्याने शहर महापालिकेच्या जलप्रदाय समितीने आठवडाभर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरकरांना मोठी समस्या होणार आहे.

माहिती देताना विजय झलके, पाणी पुरवठा सभापती , नागपूर महानगर पालिका

देशासहित राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस सुरु आहे. मात्र, विदर्भासह नागपूरवर वरूण राजा कोपल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह आणि पेंच प्रकल्पातील पाणी साठा जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागपूर शहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. पाणी कमतरतेमुळे पालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या समस्येत भर पडणार असल्याची शक्यता आहे. सध्या शहरात ऐतिहासिक पाणी टंचाई असून इतिहासात पाहिल्यांदाच एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. मात्र, आगामी काळात पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला इतर पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

Intro:पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटलाय पण नागपूर सह विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे...ऐन पावसाळयात वरून राजा रुसल्याने भर पावसाळ्यात पाणी कपातीचा संकट नागपूर शहरावर ओढवलं आहे....महापालिकेच्या जयप्रदाय समितीने आठवडा भर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नागपूर महानगर पालिकेने घेतला ...याचा सामना मात्र नागपूरकरांना करावा लागणार आहे .... Body:देशासहित राज्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस सुरु असताना मात्र विदर्भासह नागपुरवर वरूनराजा कोपल्याच चित्र सध्या पाहायला मिळत आहे, समाधान कारक पाऊस न झाल्याने नागपूरशहरावरील पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून याचा परिणाम पाणीपुरवठयावर होणार असून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे,
सध्या शहरात ऐतिहासिक पाणी टंचाई असून पालिकेच्या इतिहासात पाहिल्यान्दा एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे,
नागपूर शहराला पाणी पुरवठा कार्नार्य्या तोतलाडोह आणि पेंच मधला पाणी साठा शून्य झाला असल्याने येणाऱ्या दिवसात पाणी पुरवठा करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार पालिकेला करावा लागणार आहे

बाईट -- विजय झलके -- पाणी पुरवठा सभापती , नागपूर महानगर पालिकाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.