ETV Bharat / state

Nagpur Vajramuth Sabha : नागपूरच्या वज्रमुठ सभेत गर्दीचा उच्चांक मोडला जाईल - खासदार विनायक राऊत

author img

By

Published : Apr 12, 2023, 5:58 PM IST

महाविकास आघाडीच्या नागपुरात होणाऱ्या वज्रमुठ सभेत गर्दीचा उच्चांक मोडला जाईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी ही सभा ठरलेल्या ठिकाणीच होईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

MP Vinayak Raut
खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

नागपूर : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात 16 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहून विदर्भवासीयांशी संवाद साधणार आहेत. ही सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज नागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर येथील सभेची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे देण्यात आली आहे. सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहेत. ही सभा यशस्वी होईल, असे ते यावेळी म्हणाले.

'आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा' : राज्यातील अनेक भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे. विदर्भातही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु दुर्दैवाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारला वेळ मिळाला नाही. अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा करण्यात आला. राज्यात काही ठिकाणी शेतात बांधावर जाण्याचे नाटक करण्यात आले. पण त्याने काहीच फरक पडणार नाही, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले. राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे नियोजन दिसून येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

'सभा नियोजित ठिकाणीच होणार' : खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'नागपूरच्या सभेपुर्वी काही जणांना पोटशूळ उठली आहे. वज्रमुठ सभेला अडचणी कशा निर्माण करता येतील यासाठी काहीजण कामाला लागले आहेत. मात्र कितीही प्रयत्न केले तरी ही सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे. महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा 16 एप्रिलला नागपूर येथील दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणार आहे.

'दंगल शासन पुरस्कृत होती' : महाविकास आघाडीच्या वज्रमुठ महासभांना विरोध करण्याचे काम संभाजी नगर सभेपासून भाजपने सुरू केले आहे. सभेपुर्वी धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गृहमंत्र्यांना भेटून त्या दंगलीच्या म्होरक्याला शोधण्याचे आवाहन केले होते, पण त्याला अजूनही पकडण्यात आले नाही. ही दंगल शासन पुरस्कृत होती हे आमचे आजही म्हणणे आहे, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले आहेत.

'नागपुरात विरोधकांची मुस्कटदाबी' : नागपुरात विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वज्रमुठ सभेसाठी आमच्या कुठलेही मतभेद नाही. मतभेद असल्याच्या वावड्या भाजप उडवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या संसदेत अनेकांनी सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सावरकर गौरव यात्रेसोबत सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी करणारी यात्रा काढावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : Anil Parab Got Relief : बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरण अनिल परब यांना 19 एप्रिल पर्यंत दिलासा

खासदार विनायक राऊत

नागपूर : महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात 16 एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे. या सभेला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहून विदर्भवासीयांशी संवाद साधणार आहेत. ही सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते आज नागपूरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर येथील सभेची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे देण्यात आली आहे. सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहेत. ही सभा यशस्वी होईल, असे ते यावेळी म्हणाले.

'आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा' : राज्यातील अनेक भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे. विदर्भातही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु दुर्दैवाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारला वेळ मिळाला नाही. अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आमदारांना शांत मारण्यासाठी अयोध्या दौरा करण्यात आला. राज्यात काही ठिकाणी शेतात बांधावर जाण्याचे नाटक करण्यात आले. पण त्याने काहीच फरक पडणार नाही, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले. राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारचे नियोजन दिसून येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

'सभा नियोजित ठिकाणीच होणार' : खासदार विनायक राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'नागपूरच्या सभेपुर्वी काही जणांना पोटशूळ उठली आहे. वज्रमुठ सभेला अडचणी कशा निर्माण करता येतील यासाठी काहीजण कामाला लागले आहेत. मात्र कितीही प्रयत्न केले तरी ही सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार आहे. महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा 16 एप्रिलला नागपूर येथील दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणार आहे.

'दंगल शासन पुरस्कृत होती' : महाविकास आघाडीच्या वज्रमुठ महासभांना विरोध करण्याचे काम संभाजी नगर सभेपासून भाजपने सुरू केले आहे. सभेपुर्वी धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. गृहमंत्र्यांना भेटून त्या दंगलीच्या म्होरक्याला शोधण्याचे आवाहन केले होते, पण त्याला अजूनही पकडण्यात आले नाही. ही दंगल शासन पुरस्कृत होती हे आमचे आजही म्हणणे आहे, असे विनायक राऊत यावेळी म्हणाले आहेत.

'नागपुरात विरोधकांची मुस्कटदाबी' : नागपुरात विरोधकांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वज्रमुठ सभेसाठी आमच्या कुठलेही मतभेद नाही. मतभेद असल्याच्या वावड्या भाजप उडवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या संसदेत अनेकांनी सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सावरकर गौरव यात्रेसोबत सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी करणारी यात्रा काढावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : Anil Parab Got Relief : बेकायदा हॉटेल बांधकाम प्रकरण अनिल परब यांना 19 एप्रिल पर्यंत दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.