ETV Bharat / state

'मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर अन् ४० टक्के घेणारे तिघे वर्गात'

author img

By

Published : Jan 2, 2020, 9:49 PM IST

विधानसभा निवडणुकीत जनतेनं सर्वाधिक मतांनी भाजपला निवडून दिले आहे. मात्र, मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर आणि ४० टक्के गुण घेणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मेरटीमध्ये आल्याचे सांगत आहेत. त्यामुळे विश्वासघातानं आलेलं सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

nagpur
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नागपूर - विधानसभा निवडणुकीत जनतेनं सर्वाधिक मतांनी भाजपला निवडून दिले आहे. मात्र, मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर आणि ४० टक्के गुण घेणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मेरटीमध्ये आल्याचे सांगत आहेत. विश्वासघातानं आलेलं कोणतेही सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालले नाही. त्यामुळे हेही सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

जनतेचा कौल मिळून देखील आम्ही बाहेर आहोत आणि विश्वासघात करुन युती तोडून ते सत्तेत आहेत. विश्वासघातानं तयार झालेलं सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालत नाही, हे सरकारंही फार काळ चालणार नसल्याची टीका फडणवीस म्हणाले. विश्वासघात करण्याची मालिका सत्तेतील तिन्ही पक्षानं सुरू ठेवलीय. अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची २५ हजार रुपये मदत केली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते दिले नाही. तसेच सरसकट कर्जमाफी करणार असल्याचेही सांगितले होते, मात्र, यातील काहीच केले नाही. त्यामुळे हे सरकार फसवं असल्याचे फडणवीस म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित डीगडोहच्या सभेत फडणवीस बोलत होते. २०१४ च्या जाहिरनाम्यात आश्वासन न देताही आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर - विधानसभा निवडणुकीत जनतेनं सर्वाधिक मतांनी भाजपला निवडून दिले आहे. मात्र, मेरीटमध्ये आलेला विद्यार्थी वर्गाबाहेर आणि ४० टक्के गुण घेणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मेरटीमध्ये आल्याचे सांगत आहेत. विश्वासघातानं आलेलं कोणतेही सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालले नाही. त्यामुळे हेही सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.

जनतेचा कौल मिळून देखील आम्ही बाहेर आहोत आणि विश्वासघात करुन युती तोडून ते सत्तेत आहेत. विश्वासघातानं तयार झालेलं सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालत नाही, हे सरकारंही फार काळ चालणार नसल्याची टीका फडणवीस म्हणाले. विश्वासघात करण्याची मालिका सत्तेतील तिन्ही पक्षानं सुरू ठेवलीय. अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची २५ हजार रुपये मदत केली नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते दिले नाही. तसेच सरसकट कर्जमाफी करणार असल्याचेही सांगितले होते, मात्र, यातील काहीच केले नाही. त्यामुळे हे सरकार फसवं असल्याचे फडणवीस म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आयोजित डीगडोहच्या सभेत फडणवीस बोलत होते. २०१४ च्या जाहिरनाम्यात आश्वासन न देताही आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.

Intro:मेरिट आलेंला विद्यार्थी वर्गा बाहेर आणि ४०% मार्क्स घेणारे एकत्रित येऊन मेरिट दाखवतात -देवेंद्र फडणवीस





विधानसभा निवडणूकीत जनतेनं सर्वाधिक मतांनी भाजपला निवडूण दिलंय मेरिट मध्ये आलेला विद्यार्थी वर्गा बाहेर आहे आणि ४०% गुण घेणारे तिन्ही पक्ष स्वतःचे मार्क्स एकत्रित करून आम्ही मेरिट आल्याचं सांगत वर्गात बसले आहेत.जनतेचा कौल मिळून देखील आम्ही बाहेर आहोत आणि विश्वासघात करून युती सोडून तव सत्तेत आहेत. विश्वासघातानं तयार झालेलं सरकार देशाच्या इतिहासात फार काळ चालत नाही, हे सरकारंही फार काळ चालणार नाही. Body:विश्वासघात करण्याची मालिका सत्तेतील तिन्ही पक्षानं सुरु ठेवलीय, अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची २५ हजार रु. मदत केली नाही
आघाडीच्या सरकारनं लबाडी केलीय, शेतकऱ्यांना एक पैसाही दिला नाही अस मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडविस यांनी जिल्हा परिषदे साठी आयोजित डीगडोह च्या सभेत केलंय.२०१४ च्या जाहिरनाम्यात आश्वासन न देताही आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीय अस देखील म्हणाले


बाईट - देवेंद्र फडणवीसConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.