ETV Bharat / state

Lumpy disease : लंपीवर नियंत्रणाकरिता काय केल्या उपाययोजना ? उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला माहिती देण्याचे निर्देश

लंपी रोगामुळे ( Lumpy disease ) शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ( Farmers suffered losses due to lumpy disease ) तसेच लंपी रोगावर राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेतकरी स्वाभिमान पक्षासह इतर दोन लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) जनहित याचिका दाखल केली होती.

author img

By

Published : Oct 20, 2022, 6:39 AM IST

Lumpy disease
लंपी

मुंबई : लंपी रोगामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ( Farmers suffered losses due to lumpy disease ) तसेच लंपी रोगावर राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेतकरी स्वाभिमान पक्षासह इतर दोन लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) जनहित याचिका दाखल केली होती. या याचीकेवर आज सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की गाई गुरांमध्ये लंपी रोग सध्या व्यापक प्रमाणात पसरला आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक व्यापक धोरण निश्चित केले पाहिजे. असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर काय उपाययोजना केल्या ? याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला देत यावरील सुनावणी 17 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.


प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उदासीन : लंपी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मुख्य मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली आहे. लंपीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उदासीन आहे. त्यामुळे तातडीनं योजना तयार करत रितसर नियमावली जाहीर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणीही याचिकेतून केली असून ही याचिका न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली.


राज्य सरकार अद्यापही उदासिन का ? गाई गुरांमध्ये पसरणारा लंपी हा त्वचा रोग राज्यभरात सध्या झपाट्यानं पसरत असूनही राज्य सरकार याबाबत अद्यापही उदासिन का ? असा सवाल उपस्थित करत या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य सरकारनं याप्रकरणी परिपत्रक काढण्याशिवाय काहीही केलेले नाही असा आरोप करत स्वाभिमान शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राण्यांतील संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार तातडीनं उपाययोजना करायला हव्यात. तसेच तातडीने पशुंमधील साथरोग नियंत्रण कायदा 2009 नुसार कारवाई सुरू करण्याचीही मागणी शेट्टी यांनी याचिकेतून केली आहे. ही मुकी जनावर आपलं दु:ख बोलून दाखवू शकत नाहीत त्यामुळे सरकारतर्फे याकडे दुर्लक्ष होत असून त्याबाबत काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. लंपी या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दुभत्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.


मुंबई : लंपी रोगामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ( Farmers suffered losses due to lumpy disease ) तसेच लंपी रोगावर राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये शेतकरी स्वाभिमान पक्षासह इतर दोन लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) जनहित याचिका दाखल केली होती. या याचीकेवर आज सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की गाई गुरांमध्ये लंपी रोग सध्या व्यापक प्रमाणात पसरला आहे. त्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक व्यापक धोरण निश्चित केले पाहिजे. असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आजवर काय उपाययोजना केल्या ? याची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला देत यावरील सुनावणी 17 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.


प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उदासीन : लंपी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मुख्य मागणी करत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली आहे. लंपीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार उदासीन आहे. त्यामुळे तातडीनं योजना तयार करत रितसर नियमावली जाहीर करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणीही याचिकेतून केली असून ही याचिका न्यायमूर्ती गंगापूरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली.


राज्य सरकार अद्यापही उदासिन का ? गाई गुरांमध्ये पसरणारा लंपी हा त्वचा रोग राज्यभरात सध्या झपाट्यानं पसरत असूनही राज्य सरकार याबाबत अद्यापही उदासिन का ? असा सवाल उपस्थित करत या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य सरकारनं याप्रकरणी परिपत्रक काढण्याशिवाय काहीही केलेले नाही असा आरोप करत स्वाभिमान शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राण्यांतील संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्यातील तरतुदींनुसार तातडीनं उपाययोजना करायला हव्यात. तसेच तातडीने पशुंमधील साथरोग नियंत्रण कायदा 2009 नुसार कारवाई सुरू करण्याचीही मागणी शेट्टी यांनी याचिकेतून केली आहे. ही मुकी जनावर आपलं दु:ख बोलून दाखवू शकत नाहीत त्यामुळे सरकारतर्फे याकडे दुर्लक्ष होत असून त्याबाबत काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी याचिकेतून केला आहे. लंपी या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दुभत्या गायी किंवा म्हशींच्या मालकांना प्रत्येकी दीड लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.