ETV Bharat / state

ठरलंय तेच द्या, आम्हाला सुईच्या टोकापेक्षा अधिक नको - उद्धव ठाकरे - government formation issue

आज गुरुवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे ठरले होते त्याचप्रमाणे भाजपने द्यावे, असे स्पष्ट केले.

ठरलंय तेच द्या, आम्हाला सुई टोकापेक्षा अधिक नको
author img

By

Published : Oct 31, 2019, 4:29 PM IST

Updated : Oct 31, 2019, 4:34 PM IST

मुंबई - पद आणि जबाबदारी समान वाटण्याचे ठरले होते. तेच भाजपकडून होणे अपेक्षित आहे. जे ठरले आहे त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. आज गुरुवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोणताही प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्याशी नेहमी बोलणे होत असते. मात्र, भाजपने कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडे मांडलेला नाही, असे ठाकरे म्हणाले. सर्व शिवसैनिक कठीण परिस्थितीत निवडून आले. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन केले. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना बुंदी लाडूंच्या वाटप केले.

राज्यपाल भेटीचे उद्धव ठाकरेंचे आदेश -

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना दिले आहेत.

मुंबई - पद आणि जबाबदारी समान वाटण्याचे ठरले होते. तेच भाजपकडून होणे अपेक्षित आहे. जे ठरले आहे त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. आज गुरुवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोणताही प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्याशी नेहमी बोलणे होत असते. मात्र, भाजपने कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडे मांडलेला नाही, असे ठाकरे म्हणाले. सर्व शिवसैनिक कठीण परिस्थितीत निवडून आले. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन केले. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना बुंदी लाडूंच्या वाटप केले.

राज्यपाल भेटीचे उद्धव ठाकरेंचे आदेश -

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना दिले आहेत.

Intro: मुंबई - जे ठरलं त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
शिवसेना आमदारांना आज मार्गदर्शन करताना म्हटलं. पद आणि जबाबदारी समान वाटप ठरलं तेच भाजपकडून होणं अपेक्षित असल्याचे देखील
उध्दव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. Body:कठीण परिस्थितीत निवडून आलो त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन केलं. विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्यावर एकनाथ शिंदे कडून सर्व आमदारांना बुंदी लाडूच वाटप करण्यात आले.
कोणताही प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्याशी नेहमी बोलणे होत असत. पण भाजपने कोणताही प्रस्ताव शिवसेनेला कडे मांडलेला नाही असे उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून आलेल्या प्रस्तावाबाबत विधान केलं.
राज्यपाल भेटीचे उद्धव ठाकरेंचे आदेश
पावसामुळे पिकांचे नुकसान झाला आहे त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी राज्यपालांची भेट घेण्याचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना आदेश दिले.
Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.