ETV Bharat / state

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवार

author img

By

Published : Aug 27, 2019, 5:18 PM IST

तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा नाही तर उच्च न्यायालयाचा आहे, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे. योगा योग साधला म्हणून विरोधक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण : गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. आगामी विधानसभेच्या जागा वाटपाचा सेना-भाजप इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, माध्यमांच्या माध्यमातून ही अस्वस्थता वाढत आहे. तर सेना-भाजप युती होईल आणि जनतेच्या हिताचे सरकार येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील स्मारक वादावर बोलताना ते म्हणाले, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आणि राज्य सरकार याकडे लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर औरंगाबाद बोगस खते प्रकरणी गुन्हा दाखल होणे हा प्रक्रियेचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. हे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा नाही तर उच्च न्यायालयाचा आहे, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे. योगा योग साधला म्हणून विरोधक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण : गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळांचा नाही - मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

तब्बल २५ हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर सुरिंदर अरोरा यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, विरोधक यामध्ये राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. आगामी विधानसभेच्या जागा वाटपाचा सेना-भाजप इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, माध्यमांच्या माध्यमातून ही अस्वस्थता वाढत आहे. तर सेना-भाजप युती होईल आणि जनतेच्या हिताचे सरकार येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील स्मारक वादावर बोलताना ते म्हणाले, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आणि राज्य सरकार याकडे लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर औरंगाबाद बोगस खते प्रकरणी गुन्हा दाखल होणे हा प्रक्रियेचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Intro:Body:mh_mum_01_mungantiwar_state bank_fir_script_7204684

राज्य बँकेचे गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही..
-सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला


मुंबई: उच्च न्यायालयाच्या निर्णयाने गुन्हे दाखल होत आहे योगा योग साधला म्हणून म्हणणे आपण हायकोर्टाच्या निकालाचा अवमान करत आहोत.हा कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय नाही.गुन्हा दाखल करा असे म्हटले गुन्हा सिद्ध झाला नाही अशा शब्दात राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार ही करवाई करण्यात आली होती. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतू विरोधक यामधे राजकारण करत असल्याची टीका करत आहेत.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला.
जागा वाटपाचा सेना-भाजप इच्छुक उमेदवार अस्वस्थता असल्याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले,
चॅनलच्या माध्यमातून वाढत आहे, सेना भाजपा युती होणार आहे आणि जनतेच्या हिताचे सरकार येईल येणाऱ्या अश्या गोष्टीवर सहज मात् करू असं ते म्हणाले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन मधील स्मारक वादावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले,
सरकारची भूमिका स्पष्ट आहे,काही टेक्निकल ,तांत्रिक सोडवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आणि राज्य सरकार याकडे लक्ष ठेवणार असं त्यांनी सांगितलं.औरंगाबद बोगस खते प्रकरणीगुन्हा दाखल होणे हा प्रक्रियचा भाग आहे असं मुनगंटीवार शेवटी म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.