मुंबई - कोरोना काळात रखडलेल्या भरती प्रक्रियेची सुरुवात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र, या भरतीला मराठा नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. या नोकर भरतीमुळे हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे.
हजारो तरुणांना दिलासा -
या नोकर भरतीमुळे हजारो तरुणांना दिलासा मिळणार आहे. आरोग्य विभागातील 8 हजार 500 पद भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. 17 हजार जागांपैकी 50 टक्के जागा म्हणजेच 8 हजार 500 पद भरण्यासाठी आरोग्य विभागाने जाहिरात दिली आहे. ग्रामविकास खात्यात असणारी आरोग्य विभागाची दहा हजार पदे, तसेच आरोग्य विभागाची सात हजार पदे अशी एकूण 17 हजार पद रिकामी आहेत. त्यापैकी 50 टक्के जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटला नसल्याने होणाऱ्या या भरतीमुळे मराठा समाजावर अन्याय होणार असल्याचे मत मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.
28 फेब्रुवारीला होणार परीक्षा -
कोरोना काळात आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचारी तसेच विविध पदावर काम करणारे अधिकारी यांची कमतरता लक्षात घेता राज्य सरकारकडून सर्वात प्रथम आरोग्य विभागातील जागा भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 17 हजार जागांपैकी 50 टक्के जागा भरण्यात येणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यातील 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार असून, एकाच दिवशी ही परीक्षा होईल. फेब्रुवारी 2019 साली महापोर्टलवरुन अर्ज केलेले उमेदवारही यासाठी पात्र असणार आहेत.
आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात -
परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. या भरती संदर्भातील माहिती आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. www.mahapariksha.gov.in आणि maharashtra.gov.in यासंबंधीची माहिती उमेदवारांना मिळणार आहे. जवळजवळ दीड वर्ष रेंगाळलेल्या या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेला मराठा नेत्यांचा आक्षेप -
28 फेब्रुवारीला आरोग्य विभागातील होणाऱ्या परीक्षेला मराठा नेते विनायक मेटे यांनी आक्षेप घेतला असून आरोग्य खाते, महसूल खाते, पोलीस दल, विद्युत वितरण विभाग याठिकाणी होणारी आगामी भरती प्रक्रिया थांबवा अन्यथा आम्ही भरती जाहीर करणाऱ्या संबंधीत विभागाच्या मंत्र्यांच्या शहरात आणि जिल्ह्यात मेळावे घेऊ असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा - 'बाळासाहेबांमुळेच भाजपा गावागावात पोहचली'
हेही वाचा - 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा' नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती