ETV Bharat / state

शिवसेनेला मिळणार ४ मंत्रीपदे ? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.

author img

By

Published : May 26, 2019, 3:53 PM IST

मंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

मुंबई - एनडीएच्या नेतेपद एकमताने नरेंद्र मोदींची निवड झाली आहे. ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही मंत्र्याचाही शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.

mumbai
मंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रातून भाजपचे ५ मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेला २ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची आशा आहे. गेल्यावेळी राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार होती. मात्र, येनवेळी त्यांना विमानतळावरून परत येण्याची सूचना करण्यात आली होती. आता मात्र, त्यांना निश्चित मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघात भावना गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. मंत्री मंडळातील शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांना संधी देण्यात येईल अशीही चर्चा आहे. संजय राऊत आणि राहुल शेवाळे यांनाही मंत्रीपद मिळेल अशीही शिवसेनेच्या गोटात जोरदार चर्चा आहे.

भाजपच्या कोट्यातून आरपीआयचे रामदास आठवले यांनी पुन्हा मंत्री मंडळात संधी मिळेल. तर नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचेही मंत्रिमंडळात स्थान पक्के आहे. सुरेश प्रभू यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्री मंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मंत्री मंडळात घ्यावे अशी नितीन गडकरी यांनी इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - एनडीएच्या नेतेपद एकमताने नरेंद्र मोदींची निवड झाली आहे. ३० मे रोजी नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी काही मंत्र्याचाही शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडूनही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून, सेनेला ४ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.

mumbai
मंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रातून भाजपचे ५ मंत्री होण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेला २ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची आशा आहे. गेल्यावेळी राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार होती. मात्र, येनवेळी त्यांना विमानतळावरून परत येण्याची सूचना करण्यात आली होती. आता मात्र, त्यांना निश्चित मंत्रीपद मिळेल अशी शक्यता आहे. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघात भावना गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. मंत्री मंडळातील शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांना संधी देण्यात येईल अशीही चर्चा आहे. संजय राऊत आणि राहुल शेवाळे यांनाही मंत्रीपद मिळेल अशीही शिवसेनेच्या गोटात जोरदार चर्चा आहे.

भाजपच्या कोट्यातून आरपीआयचे रामदास आठवले यांनी पुन्हा मंत्री मंडळात संधी मिळेल. तर नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचेही मंत्रिमंडळात स्थान पक्के आहे. सुरेश प्रभू यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्री मंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मंत्री मंडळात घ्यावे अशी नितीन गडकरी यांनी इच्छा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:अनिल देसाई ,भावना गवळी, राहुल शेवाळे आणि संजय राऊत मंत्रीपदाच्या चर्चेत आघाडीवर....

मुंबई 26

एनडीएच्या नेतेपद एकमताने नरेंद्र मोदी यांची निवड झाल्या नंतर मोदी दुसऱ्यांदा येत्या 30 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. शिवसेनेकडूनही मंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग होत असून सेनेला चार मंत्रिपद मिळण्याची आशा आहे.यात खासदार संजय राऊत, अनिल देसाई, भावना गवळी आणि राहुल शेवाळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महाराष्ट्रातून भाजपचे पाच मंत्री होण्याची दाट शक्यता आहे.तर शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदाची आशा आहे. गेल्यावेळी राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार होती, मात्र येन वेळी त्यांना विमानतळावरून परत येण्याची सूचना करण्यात आली होती. आता मात्र त्यांना निश्चित मंत्री पद मिळेल अशी अशी शक्यता आहे. यवतमाळ- वाशीम या लोकसभा मतदार संघात भावना गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. मंत्री मंडळातील शिवसेनेचा महिला चेहरा म्हणून त्यांना संधी देण्यात येईल अशीही चर्चा आहे. शिवसेनेचे निकट वर्तीय संजय राऊत आणि राहुल शेवाळे यांनाही मंत्री पद मिळेल अशी ही शिवसेनेच्या गोटात जोरदार चर्चा आहे.
भाजपच्या कोट्यातून आरपीआयचे रामदास आठवले यांनी पुन्हा मंत्री मंडळात संधी मिळेल. तर नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचे ही मंत्रिमंडळात स्थान पक्के आहे. सुरेश प्रभू यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा मंत्री मंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र हंसराज अहिर यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मंत्री मंडळात घ्यावे अशी नितीन गडकरी यांनी इच्छा असल्याचे सांगण्यात येतंय.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.