ETV Bharat / state

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

author img

By

Published : Nov 19, 2022, 12:11 PM IST

Updated : Nov 19, 2022, 5:31 PM IST

राज ठाकरे यांच्या भेटीला स्वातंत्र्यावीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर( Ranjit Savarkar meets Raj Thackeray ) . मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मंजिरी मराठे हे त्यांच्यासोबत आहेत.

Ranjit Savarkar
रणजित सावरकर

मुंबई : राज ठाकरे यांच्या भेटीला स्वातंत्र्यावीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर( Ranjit Savarkar meets Raj Thackeray ). मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मंजिरी मराठे हे त्यांच्यासोबत आहेत. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभर पहायला मिळत( Rahul Gandhi Offensive Statement Against Savarka ) आहेत. अशातच या भेटीने वेगळे काय होईल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

रणजित सावरकर

रणजीत सावरकर यांची पत्रकार परिषद : काल वीर सावरकर स्मारक येथे रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. ब्रिटिशांना लिहलेल्या पत्रात "इट इज ओनर टू रीमेन युवर हम्बल" असे देखील गांधीजींनी लिहिले होते. मग याचा अर्थ गांधीजींना ब्रिटिशांचा नोकर बनायचे होते ?असा अर्थ मी काढणार नाही, असा टोला रणजित सावरकर यांनी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून लावला. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या पत्राचे गुगल ट्रान्सलेट केले असल्याचा चिमटा देखील पत्रकार परिषदेतून काढला होता. जलियान वाला बाग हत्याकांडात हुतात्म्य पत्करणाऱ्यांना गांधीजी हुतात्मे बोलणार नाही असे म्हणाले होते. हा गांधीजींनी देशभक्तांच्या अपमान केला. तर भगतसिंह यांचे प्राण वाचले असते - गांधीजींनी योग्य वेळी करार झाला असता तर भगत सिंह यांचे देखील प्राण वाचले असते. मग याला देशद्रोह म्हणायचे नाही का? असेही रणजीत सावंत पत्रकार परिषदेतून म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्यात गांधीच्या विरोधात परिषदा झाल्या होत्या. मग आता राहुल गांधी बाबासाहेब यांचाही विरोध करतील का? असा सवाल देखील सावरकर यांनी उपस्थित केला होता.

सावरकारांनी कायद्यानुसार अर्ज केला : वीर सावरकर यांनी कायद्याने हक्क मागितला. हक्क मागणे वाईट नाहीये. सावरकर यांची जी मागणी होती त्यात त्यांनी बाहेर सोडण्यासाठी कायद्याने मागणी केली होती. सामान्य बंदी असतील तर त्यांना 6 महिन्यात बाहेर सोडले जायचे. मात्र त्यांना सोडण्यात आले नव्हते म्हणून त्यांनी कायद्यानुसार अर्ज केला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आपण तक्रार दाखल केली असून पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध देखील नोंदविण्यात येत आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी रणजीत सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई : राज ठाकरे यांच्या भेटीला स्वातंत्र्यावीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर( Ranjit Savarkar meets Raj Thackeray ). मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मंजिरी मराठे हे त्यांच्यासोबत आहेत. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्याचे पडसाद राज्यभर पहायला मिळत( Rahul Gandhi Offensive Statement Against Savarka ) आहेत. अशातच या भेटीने वेगळे काय होईल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

रणजित सावरकर

रणजीत सावरकर यांची पत्रकार परिषद : काल वीर सावरकर स्मारक येथे रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. ब्रिटिशांना लिहलेल्या पत्रात "इट इज ओनर टू रीमेन युवर हम्बल" असे देखील गांधीजींनी लिहिले होते. मग याचा अर्थ गांधीजींना ब्रिटिशांचा नोकर बनायचे होते ?असा अर्थ मी काढणार नाही, असा टोला रणजित सावरकर यांनी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेतून लावला. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या पत्राचे गुगल ट्रान्सलेट केले असल्याचा चिमटा देखील पत्रकार परिषदेतून काढला होता. जलियान वाला बाग हत्याकांडात हुतात्म्य पत्करणाऱ्यांना गांधीजी हुतात्मे बोलणार नाही असे म्हणाले होते. हा गांधीजींनी देशभक्तांच्या अपमान केला. तर भगतसिंह यांचे प्राण वाचले असते - गांधीजींनी योग्य वेळी करार झाला असता तर भगत सिंह यांचे देखील प्राण वाचले असते. मग याला देशद्रोह म्हणायचे नाही का? असेही रणजीत सावंत पत्रकार परिषदेतून म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्यात गांधीच्या विरोधात परिषदा झाल्या होत्या. मग आता राहुल गांधी बाबासाहेब यांचाही विरोध करतील का? असा सवाल देखील सावरकर यांनी उपस्थित केला होता.

सावरकारांनी कायद्यानुसार अर्ज केला : वीर सावरकर यांनी कायद्याने हक्क मागितला. हक्क मागणे वाईट नाहीये. सावरकर यांची जी मागणी होती त्यात त्यांनी बाहेर सोडण्यासाठी कायद्याने मागणी केली होती. सामान्य बंदी असतील तर त्यांना 6 महिन्यात बाहेर सोडले जायचे. मात्र त्यांना सोडण्यात आले नव्हते म्हणून त्यांनी कायद्यानुसार अर्ज केला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात आपण तक्रार दाखल केली असून पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध देखील नोंदविण्यात येत आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी रणजीत सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Last Updated : Nov 19, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.