ETV Bharat / state

Maharashtra Bhushan Award Row : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन राज ठाकरे, अंबादास दानवेंची सरकारवर टीका; म्हणाले, राजकारणासाठी वापर...

author img

By

Published : Apr 17, 2023, 3:40 PM IST

सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचा स्वतःच्या राजकिय स्वार्थापोटी वापर केला, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी देखील काल रात्री रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली.

Raj Thackeray and Ambadas Danve
राज ठाकरे आणि अंबादास दानवे
राज ठाकरे आणि अंबादास दानवे

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन उष्माघात आणि चेंगराचेंगरी पीडित रुग्णांची भेट घेतली. आप्पासाहेब धर्माधिकारींना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राजभवनावर बोलावून देण्यात येऊ शकला असता, मात्र सरकारने तसे न करता केवळ राजकिय स्वार्थापोटी लोकांच्या जीवाशी खेळत या चांगल्या कार्यक्रमाचा इव्हेन्ट केल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अंबादास दानवे यांनी रुग्णालयाला भेट दिली : या अगोदर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली. दानवे यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाच्या अधिकारी आणि सचिवांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा देखील मागितला आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे सध्या या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी देखील रात्री पीडितांची भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णांची भेट घेतली : या संदर्भात माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'तिथे जी काही लोक आली होती, ती सर्व आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारी होती. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी आलेल्या समाजाचा राजकारणाने अंत पाहिला आहे. हा अंत इतक्या टोकाला गेला की उष्माघाताने तिथल्या उपस्थित लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री नागपूरमधील सभा आटोपल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबईत आलो. यावेळी मध्यरात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्या रुग्णांची भेट घेऊन, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले'.

सरकारवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकसेवेबाबत आमच्या मनात आदर आहे. त्याबाबत आता काहीही बोलणार नाही. पण, जी काही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत जे रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या काही लोक सरकारवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. ती ठीक आहे. पण इथे येणाऱ्या श्री सदस्यांची व्यवस्था न पाहता राजकीय व्यवस्था पाहिली गेली एवढे मात्र निश्चित आहे.

'सरकारने कार्यक्रमाचा राजकारणासाठी वापर केला' : संजय राऊत पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ही मागणी चुकीची म्हणता येणार नाही. कारण हा कार्यक्रम सरकारी होता. सरकारने या लोकांना बोलावले होते. सरकारकडे तज्ञ एक्सपर्ट असतात जे प्रत्येक गोष्टीचा अहवाल सादर करत असतात. मला वाटते या अनुभवी लोकांना समजायला हवे होते की हा कार्यक्रम किती वाजता सुरू व्हायला हवा, किती वाजता संपला पाहिजे, किती वेळ सुरू राहिला पाहिजे. या सगळ्याचा अंदाज या लोकांना असायला हवा होता. मात्र सरकारने या कार्यक्रमाचा फक्त राजकारणासाठी फायदा करून घेतला आणि त्यामुळेच हे बळी गेले असे मला वाटते. त्यामुळे ही चौकशीची मागणी देखील योग्य वाटते'.

हेही वाचा : Sanjay Raut News : सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्यच - खासदार संजय राऊत

राज ठाकरे आणि अंबादास दानवे

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 12 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन उष्माघात आणि चेंगराचेंगरी पीडित रुग्णांची भेट घेतली. आप्पासाहेब धर्माधिकारींना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राजभवनावर बोलावून देण्यात येऊ शकला असता, मात्र सरकारने तसे न करता केवळ राजकिय स्वार्थापोटी लोकांच्या जीवाशी खेळत या चांगल्या कार्यक्रमाचा इव्हेन्ट केल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

अंबादास दानवे यांनी रुग्णालयाला भेट दिली : या अगोदर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील रुग्णालयाला भेट दिली. दानवे यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाच्या अधिकारी आणि सचिवांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सांस्कृतिक विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा देखील मागितला आहे. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे सध्या या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी देखील रात्री पीडितांची भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रुग्णांची भेट घेतली : या संदर्भात माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'तिथे जी काही लोक आली होती, ती सर्व आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारी होती. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी आलेल्या समाजाचा राजकारणाने अंत पाहिला आहे. हा अंत इतक्या टोकाला गेला की उष्माघाताने तिथल्या उपस्थित लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री नागपूरमधील सभा आटोपल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबईत आलो. यावेळी मध्यरात्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्या रुग्णांची भेट घेऊन, मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले'.

सरकारवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकसेवेबाबत आमच्या मनात आदर आहे. त्याबाबत आता काहीही बोलणार नाही. पण, जी काही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेत जे रुग्णालयात उपचार घेत आहेत, ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. सध्या काही लोक सरकारवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. ती ठीक आहे. पण इथे येणाऱ्या श्री सदस्यांची व्यवस्था न पाहता राजकीय व्यवस्था पाहिली गेली एवढे मात्र निश्चित आहे.

'सरकारने कार्यक्रमाचा राजकारणासाठी वापर केला' : संजय राऊत पुढे म्हणाले की, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकार विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ही मागणी चुकीची म्हणता येणार नाही. कारण हा कार्यक्रम सरकारी होता. सरकारने या लोकांना बोलावले होते. सरकारकडे तज्ञ एक्सपर्ट असतात जे प्रत्येक गोष्टीचा अहवाल सादर करत असतात. मला वाटते या अनुभवी लोकांना समजायला हवे होते की हा कार्यक्रम किती वाजता सुरू व्हायला हवा, किती वाजता संपला पाहिजे, किती वेळ सुरू राहिला पाहिजे. या सगळ्याचा अंदाज या लोकांना असायला हवा होता. मात्र सरकारने या कार्यक्रमाचा फक्त राजकारणासाठी फायदा करून घेतला आणि त्यामुळेच हे बळी गेले असे मला वाटते. त्यामुळे ही चौकशीची मागणी देखील योग्य वाटते'.

हेही वाचा : Sanjay Raut News : सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्यच - खासदार संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.