ETV Bharat / state

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट; पादचारी पूलांचा वापर करण्यास टाळाटाळ

author img

By

Published : Nov 30, 2019, 6:06 PM IST

रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही स्थानकात वरून तर काही ठिकाणी भूमिगत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवासी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात.

बेलापूर
बेलापूर

मुंबई - हार्बर मार्गावरील अत्याधुनिक रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली आहे. मात्र, पुलाची व्यवस्था असूनही प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे रूळ ओलांडण्याचा हा शॉर्टकट मार्ग जीवघेणा ठरू शकतो, याकडे प्रवासी दुर्लक्ष करत आहेत.

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट


नवी मुंबईतील हार्बर रेल्वेची बेलापूर, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैराणे, घणसोली, रबाळे, ऐरोली ही महत्त्वाची रेल्वे स्थानकं आहेत. या रेल्वे स्थानकांवरून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने लोकल रेल्वे धावत असतात. दररोज हजारो प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी असते.

हेही वाचा - एकाच ट्रॅकवर डेक्कन रेल्वे आणि लोकल ट्रेन एकापाठोपाठ थांबल्या!
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही स्थानकात वरून तर काही ठिकाणी भूमिगत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवासी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. यामध्ये विद्यार्थ्यी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे.


यापूर्वीही अनेकदा रूळ ओलांडताना अपघात झालेले आहेत. त्यानंतरही प्रवासी आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोकल येत असल्याचे ध्वनिक्षेपकांवरून सूचनाही देण्यात येतात, तरीही विद्यार्थी व काही नागरिक रूळ ओलांडून पलीकडे जात असल्याचे चित्र बेलापूर स्थानकात दिसले. मात्र, या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - हार्बर मार्गावरील अत्याधुनिक रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली आहे. मात्र, पुलाची व्यवस्था असूनही प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे रूळ ओलांडण्याचा हा शॉर्टकट मार्ग जीवघेणा ठरू शकतो, याकडे प्रवासी दुर्लक्ष करत आहेत.

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट


नवी मुंबईतील हार्बर रेल्वेची बेलापूर, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैराणे, घणसोली, रबाळे, ऐरोली ही महत्त्वाची रेल्वे स्थानकं आहेत. या रेल्वे स्थानकांवरून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने लोकल रेल्वे धावत असतात. दररोज हजारो प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी असते.

हेही वाचा - एकाच ट्रॅकवर डेक्कन रेल्वे आणि लोकल ट्रेन एकापाठोपाठ थांबल्या!
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही स्थानकात वरून तर काही ठिकाणी भूमिगत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवासी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. यामध्ये विद्यार्थ्यी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे.


यापूर्वीही अनेकदा रूळ ओलांडताना अपघात झालेले आहेत. त्यानंतरही प्रवासी आपला जीव धोक्यात घालत आहेत. लोकल येत असल्याचे ध्वनिक्षेपकांवरून सूचनाही देण्यात येतात, तरीही विद्यार्थी व काही नागरिक रूळ ओलांडून पलीकडे जात असल्याचे चित्र बेलापूर स्थानकात दिसले. मात्र, या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा शॉर्टकट

ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा असूनही प्रवासी व नागरिक राजरोसपणे जीव घाताहेत धोक्यात ..

नवी मुंबई:

नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील अत्याधुनिक रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची सुविधा केली असूनही या ठिकाणी प्रवासी राजरोसपणे जीव धोक्यात घालून, रेल्वे रूळ ओलांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र रेल्वे रूळ ओलांडण्याचा त्यांचा हा शॉर्टकट मार्ग बऱ्याचदा जीवघेणा ठरू शकतो.हे विसरून नागरिक बिनदिक्कत हे धाडस करीत आहेत.
नवी मुंबईती शहरातील हार्बर रेल्वे बेलापूर नेरुळ, जुईनगर,सानपाडा, वाशी, तूूर्भे, कोपरखैराणे,घणसोली रबाळे ऐरोली ही महत्वाची रेल्वे स्थानक असून या स्थानकांवरून सतत दहा ते पंधरा मिनिटांनी लोकल रेल्वे धावत असतात. विविध खासगी-सरकारी उद्योगांची महत्त्वाची कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा यांसह मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले असल्याने रोज हजारो प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी असते.
रेल्वेस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही स्थानकात वरून तर काही ठिकाणी भूमिगत पादचारी पूल उभारण्यात आला आहे. परंतु त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यक सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे प्रवाशी बिनधास्त व राजरोसपणे जीव धोक्यात घालून रूळ ओलांडताना दिसत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. विशेष:त महिलावर्ग धोकादायकरित्या रूळ ओलांडत आहेत. यापूर्वी स्थानकात अनेकदा रूळ ओलांडताना अपघात झालेले आहेत. त्यानंतरही रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे..
बेलापूर स्थानकात बाजारात खरेदी करून काही महिला रेल्वे रूळ ओलांडून येत होत्या, तर शालेय विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध नागरिक रूळ ओलांडून पलीकडे जात होते. या वेळी रेल्वे लोकल येत असल्याचे ध्वनिक्षेपकावरून सूचनाही करण्यात होती. मात्र, तरीही विद्यार्थी व काही नागरिक रूळ ओलांडून रेल्वे रुळावरून जात होते. काही विद्यार्थी रेल्वे रुळाजवळच गप्पा मारताना दिसून येत होते तर काही व्यक्ती रुळाच्या मधोमध चालून प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिक बाटल्या उचलताना दिसून आले. दरम्यान, बऱ्याच वेळा या ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात झाल्याच्याही घटना घडूनही, लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वच शॉर्टकट म्हणून वेळ वाचविण्यासाठी बिनधास्तपणे रूळ ओलांडत आहे.
पादचारी पुलावरून न जाता, प्लॅटफार्मखाली रेल्वे ट्रॅकवर उडी मारून जाणाऱ्या महाभागांची संख्याही वाढत आहे. रूळ ओलांडणे कायदेशीर गुन्हा असून, दंडाची तरतूद आहे. मात्र, या ठिकाणी रेल्वे पोलीस उपस्थित नसल्यामुळे रूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.