ETV Bharat / state

राज्यात लॉकडाऊन काळात क्वारंनटाईनचे उल्लंघन करणाऱ्या 540 जणांना अटक

author img

By

Published : Apr 16, 2020, 7:11 PM IST

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 97 घटना घडल्या असून या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला बसला असून तब्बल 7 पोलीस अधिकारी व 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात लॉकडाऊन काळात क्वारंनटाईनचे उल्लंघन करणाऱ्या 540 जणांना अटक
राज्यात लॉकडाऊन काळात क्वारंनटाईनचे उल्लंघन करणाऱ्या 540 जणांना अटक

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून ३ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. २२ मार्च ते १६ एप्रिल या काळामध्ये संपूर्ण ४६ हजार ६७१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर क्वारंनाटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ५४० जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 97 घटना घडल्या असून या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला बसला असून तब्बल 7 पोलीस अधिकारी व 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोविड 19 च्या संदर्भात 69 हजार 462 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे 1019 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 9 हजार 155 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 31 हजार 296 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 80 लाख 10 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 5 हजार 967 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 3 हजार 931, नागपूर शहर 2 हजार 888 , नाशिक शहर 2 हजार 835, सोलापूर 3 हजार 359 गुन्हे नोंदविण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी 51, तर अकोला येथे 53 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

व्हिसा संदर्भात विदेशी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 156 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात मुंबईत 32, अहमदनगर 29 ,अमरावती 18, पुणे 8 नागपूर शहर 8, ठाणे शहर 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9 , नवी मुंबई 10 तर नांदेडमध्ये 10 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून ३ मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. २२ मार्च ते १६ एप्रिल या काळामध्ये संपूर्ण ४६ हजार ६७१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर क्वारंनाटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ५४० जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 97 घटना घडल्या असून या गुन्ह्यात 162 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका मुंबई पोलीस खात्याला बसला असून तब्बल 7 पोलीस अधिकारी व 16 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात कोविड 19 च्या संदर्भात 69 हजार 462 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे 1019 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 9 हजार 155 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 31 हजार 296 वाहन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 80 लाख 10 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 5 हजार 967 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 3 हजार 931, नागपूर शहर 2 हजार 888 , नाशिक शहर 2 हजार 835, सोलापूर 3 हजार 359 गुन्हे नोंदविण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी 51, तर अकोला येथे 53 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

व्हिसा संदर्भात विदेशी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 156 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात मुंबईत 32, अहमदनगर 29 ,अमरावती 18, पुणे 8 नागपूर शहर 8, ठाणे शहर 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9 , नवी मुंबई 10 तर नांदेडमध्ये 10 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.