ETV Bharat / state

दिलासादायक..! 48 तासांत एकही पोलीस कोरोना पाॅझिटिव्ह नाही - महाराष्ट्रात पोलिसांना कोरोना लागण

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 24 हजार 103 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 722 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

no-police-corona-positive-found-in-last-48-hours-in-maharastra
गेल्या 48 तासात एकही पोलीस कोरोना पाॅझिटिव्ह नाही
author img

By

Published : Jun 9, 2020, 3:22 PM IST

मुंबई- राज्य पोलीस दलासाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 48 तासांत राज्य पोलीस दलात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. मात्र, कोरोनाग्रस्त 34 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 431 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 195 पोलीस अधिकारी, तर 1 हजार 236 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या 48 तासांत एकही पोलीस कोरोना पाॅझिटिव्ह नाही
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 24 हजार 103 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 722 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 843 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 958 हून अधिक कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत, तर अवैध वाहतुकीच्या 1 हजार 332 प्रकरणात 23 हजार 915 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 556 वाहन जप्त करण्यात आली आहेत, तर तब्बल 6 कोटी 79 लाख 81 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 47 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा- लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन

मुंबई- राज्य पोलीस दलासाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 48 तासांत राज्य पोलीस दलात एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. मात्र, कोरोनाग्रस्त 34 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1 हजार 431 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 195 पोलीस अधिकारी, तर 1 हजार 236 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गेल्या 48 तासांत एकही पोलीस कोरोना पाॅझिटिव्ह नाही
लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 24 हजार 103 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 722 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात लाॅकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 843 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 958 हून अधिक कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत, तर अवैध वाहतुकीच्या 1 हजार 332 प्रकरणात 23 हजार 915 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 556 वाहन जप्त करण्यात आली आहेत, तर तब्बल 6 कोटी 79 लाख 81 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 47 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

हेही वाचा- लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.