ETV Bharat / state

Raj Thackeray Letter To PM : '...तर मोदी सरकार जबाबदार; राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार उसळला आहे. हिंसाचाराच्या नवनवीन घटना रोज घडत आहेत. मणिपूरमध्ये संतप्त जमावाने भाजपच्या एका मंत्र्याच्या घरावरही हल्ला केला आहे. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र, याबाबत मौन बाळगून आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.

author img

By

Published : Jul 1, 2023, 10:47 PM IST

Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई : मणिपूर हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मणिपूरमधील हिंसाचार ( Manipur violence ) लवकरात लवकर थांबवावा, अन्यथा मणिपूरसह ईशान्य भारत देशापासून वेगळे होण्याच्या विचाराला वेग येईल. याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असे राज ठाकरे ( Raj Thackeray letter to PM Modi ) यांनी पत्रात लिहिले आहे. मणिपूरमधील सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्लाही राज ठाकरेंनी या पत्रात दिला आहे.



राज ठाकरेंनी नेमके काय म्हटले पत्रात? : राज ठाकरे यांनी ( MNS president Raj Thackeray ) पत्रात म्हटले आहे की, “ईशान्य भारतातील मणिपूर राज्य असंतोषाने ग्रासले आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या घरावर काही नागरिकांनी हल्ला केल्याने परिस्थिती रसातळाला गेली आहे. हा सर्व प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी का ठरत आहे? हे कळत नाही."असा सवाल ठाकरे यांनी पत्रातून मोदींना विचारला आहे.

तर.. मोदी सरकार जबाबदार : "जर मणिपूरचे सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींनी ईशान्येला आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण आता मणिपूरकडे दुर्लक्ष का केले जात आहे? हे पाहता वाजपेयींचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. मणिपूरला वेळीच शांत न केल्यास मणिपूरमधील लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. फक्त मणिपूरमध्येच नाही तर ईशान्य भारतालाही या घटनेमुळे धोका निर्माण होईल. असे झाल्यास याला केंद्रातले मोदी सरकार जबाबदार असेल. त्यासाठी 'मी' पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना ठोस पावले उचलण्याची विनंती करतो'; असे पत्र राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहांना लिहले आहे.

समृद्धी द्रुतगती मार्गावर बसचा अपघात : समृद्धी द्रुतगती मार्गावर शनिवारी (1 जुलै) पहाटे एका खाजगी बसचा अपघात झाला. या बस अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे… pic.twitter.com/lRjS4eMAA8

    — Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या पोस्ट मध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, "बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. महामार्गांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या चालक, ट्र्क चालक बेदरकारीने गाड्या चालवतात. त्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवे.", अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.

हेही वाचा - Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; रविवारी होणार सामूहिक अंत्यसंस्कार, चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मणिपूर हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने मणिपूरमधील हिंसाचार ( Manipur violence ) लवकरात लवकर थांबवावा, अन्यथा मणिपूरसह ईशान्य भारत देशापासून वेगळे होण्याच्या विचाराला वेग येईल. याला केंद्र सरकार जबाबदार असेल, असे राज ठाकरे ( Raj Thackeray letter to PM Modi ) यांनी पत्रात लिहिले आहे. मणिपूरमधील सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्लाही राज ठाकरेंनी या पत्रात दिला आहे.



राज ठाकरेंनी नेमके काय म्हटले पत्रात? : राज ठाकरे यांनी ( MNS president Raj Thackeray ) पत्रात म्हटले आहे की, “ईशान्य भारतातील मणिपूर राज्य असंतोषाने ग्रासले आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या घरावर काही नागरिकांनी हल्ला केल्याने परिस्थिती रसातळाला गेली आहे. हा सर्व प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी का ठरत आहे? हे कळत नाही."असा सवाल ठाकरे यांनी पत्रातून मोदींना विचारला आहे.

तर.. मोदी सरकार जबाबदार : "जर मणिपूरचे सध्याचे नेतृत्व परिस्थिती हाताळण्यात कुचकामी ठरत असेल, तर भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयींनी ईशान्येला आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण आता मणिपूरकडे दुर्लक्ष का केले जात आहे? हे पाहता वाजपेयींचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. मणिपूरला वेळीच शांत न केल्यास मणिपूरमधील लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. फक्त मणिपूरमध्येच नाही तर ईशान्य भारतालाही या घटनेमुळे धोका निर्माण होईल. असे झाल्यास याला केंद्रातले मोदी सरकार जबाबदार असेल. त्यासाठी 'मी' पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना ठोस पावले उचलण्याची विनंती करतो'; असे पत्र राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहांना लिहले आहे.

समृद्धी द्रुतगती मार्गावर बसचा अपघात : समृद्धी द्रुतगती मार्गावर शनिवारी (1 जुलै) पहाटे एका खाजगी बसचा अपघात झाला. या बस अपघातात तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे… pic.twitter.com/lRjS4eMAA8

    — Raj Thackeray (@RajThackeray) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आपल्या पोस्ट मध्ये राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, "बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. महामार्गांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या चालक, ट्र्क चालक बेदरकारीने गाड्या चालवतात. त्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवे.", अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.

हेही वाचा - Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; रविवारी होणार सामूहिक अंत्यसंस्कार, चालक पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.