ETV Bharat / state

Maharashtra Politics: 'तुम्ही एकटेच नाही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील 'या' ऱ्हासाला तितकेच जबाबदार आहेत- संदीप देशपांडेचे संजय राऊतांना पत्र

author img

By

Published : Feb 22, 2023, 2:18 PM IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा गट सध्या आक्रमक झालेला दिसून येतो. शेंदे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सध्या विरोधकांवर सडकून टीका करताना दिसून येत आहेत. टीका करताना अनेकदा संजय राऊत यांची भाषा घसरलेली दिसून येते. अनेकदा ते अपशब्दांचा वापर करतात. यावरून खासदार राऊत यांच्यावर अनेकदा टीका होते. मात्र, यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व नेते संदीप देशपांडे यांनी पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

Maharashtra Politics
संदीप देशपांडेचे संजय राऊतांना पत्र

मुंबई : संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात संजय राऊत यांना त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेची सध्याची जी काही स्थिती झाली आहे, त्याला फक्त ते स्वतः जबाबदार नाहीत. यासाठी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे देखील तितकेच जबाबदार असल्याचे संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडू लागल्या की, मानसिक स्वास्थ्य ढासाळते, चिडचिड होते, कधीकधी नैराश्याचे झटके देखील येतात. असे म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Maharashtra Politics
संदीप देशपांडेचे संजय राऊतांना पत्र



काय आहे पत्रात? संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, हे येडं** मला का पत्र लिहतेय असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, पण विश्‍वास ठेवा वा ठेवू नका तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेन्शन सिकिंग होतो. तुम्ही कितीही नाकारलेत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळे हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.



पटलं तर घ्या नाहीतर : माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्याऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असे करता येईल का? ते जरूर पाहा. ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावले आहे. त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर 'पवार, पवार' असे ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्‍तिगत संवाद होता, ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या... नाही पटलं तर चू** आहे असे म्हणून विसरून जा! असे पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा : MPSC Student Protest: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबत पवारांची नौटंकी; विरोधाचे राजकारण करण्यासाठी...- दरेकरांचा आरोप

मुंबई : संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात संजय राऊत यांना त्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेची सध्याची जी काही स्थिती झाली आहे, त्याला फक्त ते स्वतः जबाबदार नाहीत. यासाठी आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे देखील तितकेच जबाबदार असल्याचे संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडू लागल्या की, मानसिक स्वास्थ्य ढासाळते, चिडचिड होते, कधीकधी नैराश्याचे झटके देखील येतात. असे म्हणत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Maharashtra Politics
संदीप देशपांडेचे संजय राऊतांना पत्र



काय आहे पत्रात? संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, हे येडं** मला का पत्र लिहतेय असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल, पण विश्‍वास ठेवा वा ठेवू नका तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेन्शन सिकिंग होतो. तुम्ही कितीही नाकारलेत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळे हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.



पटलं तर घ्या नाहीतर : माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्याऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असे करता येईल का? ते जरूर पाहा. ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावले आहे. त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर 'पवार, पवार' असे ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्‍तिगत संवाद होता, ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या... नाही पटलं तर चू** आहे असे म्हणून विसरून जा! असे पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा : MPSC Student Protest: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबत पवारांची नौटंकी; विरोधाचे राजकारण करण्यासाठी...- दरेकरांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.