ETV Bharat / state

पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मनसे नगरसेवकाचे वर्षभराचे मानधन

मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आपले वर्षभराचे मानधन देऊन आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.

author img

By

Published : Feb 27, 2019, 10:19 AM IST

Mumbai

मुंबई - काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. याचा आनंद देशभर व्यक्त केला जात आहे. पालिका सभागृहातही त्याबाबत भाषणे ठोकून अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, त्याच वेळी मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आपले वर्षभराचे मानधन देऊन आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.

जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये भारताच्या ४९ सैनिकांना वीरमरण आले होते. याचा बदला घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरावर केली जात होती. मंगळवारी पहाटे भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी केंद्रांवर हल्ला करत ती केंद्र उध्वस्त केली. वायू दलाने केलेली कामगिरी समजताच देशभरात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातही भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. पालिका सभागृहात भारतीय वायू दलाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.

या सर्व घडामोडी सुरू असताना मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेवक असलेले संजय तुर्डे यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना एक पत्र दिले आहे. या पत्रात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांचा आपल्याला अभिमान असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देशवासीय म्हणून खंभीरपणे उभे राहण्याच्या भावनेतून आपण आपले वर्षभराचे नगरसेवकपदाचे मानधन देत असल्याचे नमूद केले आहे. आपल्या या विनंतीचा त्वरित विचार करून तातडीने त्याची अमंलबजावणी करावी आणि सदर निधी संबंधितांपर्यंत पोहचवावी, अशी विनंती तुर्डे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

undefined

एवढे दिले मानधन-

मुंबई महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाला दरमहा २५ हजार रुपये मानधन दिले जाते. एका वर्षात नगरसेवकाला ३ लाख रुपये मानधन स्वरूपात मिळतात. हे मानधन म्हणून मिळणारे ३ लाख रुपये तुर्डे यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दिले आहेत.

मुंबई - काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. याचा आनंद देशभर व्यक्त केला जात आहे. पालिका सभागृहातही त्याबाबत भाषणे ठोकून अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, त्याच वेळी मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आपले वर्षभराचे मानधन देऊन आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली आहे.

जम्मू काश्मीर येथील पुलवामामध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये भारताच्या ४९ सैनिकांना वीरमरण आले होते. याचा बदला घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरावर केली जात होती. मंगळवारी पहाटे भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी केंद्रांवर हल्ला करत ती केंद्र उध्वस्त केली. वायू दलाने केलेली कामगिरी समजताच देशभरात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातही भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. पालिका सभागृहात भारतीय वायू दलाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.

या सर्व घडामोडी सुरू असताना मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेवक असलेले संजय तुर्डे यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना एक पत्र दिले आहे. या पत्रात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांचा आपल्याला अभिमान असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी देशवासीय म्हणून खंभीरपणे उभे राहण्याच्या भावनेतून आपण आपले वर्षभराचे नगरसेवकपदाचे मानधन देत असल्याचे नमूद केले आहे. आपल्या या विनंतीचा त्वरित विचार करून तातडीने त्याची अमंलबजावणी करावी आणि सदर निधी संबंधितांपर्यंत पोहचवावी, अशी विनंती तुर्डे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

undefined

एवढे दिले मानधन-

मुंबई महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाला दरमहा २५ हजार रुपये मानधन दिले जाते. एका वर्षात नगरसेवकाला ३ लाख रुपये मानधन स्वरूपात मिळतात. हे मानधन म्हणून मिळणारे ३ लाख रुपये तुर्डे यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना दिले आहेत.

Intro:मुंबई -
काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. याचा आनंद देशभर व्यक्त केला जात आहे. पालिका सभागृहातही त्याबाबत भाषणे ठोकून अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र त्याच वेळी मनसेचे एकमेव नगरसेवक असलेल्या संजय तुर्डे यांनी शाहिद जवानांना आपले वर्षभराचे मानधन देऊन आगळी वेगळी श्रद्धांजली वाहिली. Body:नुकताच जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात भारतीय ४२ सैनिक शहीद झाले. याचा बदला घ्यावा अशी मागणी सर्व स्तरावर घेतली जात होती. मंगळवारी पहाटे भारतीय वायू दलाने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी केंद्रांवर हल्ला करत ती केंद्र उध्वस्त केली. वायू दलाने केलेली कामगिरी समजताच देशभरात सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातही भाजपाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. पालिका सभागृहात भारतीय वायू दलाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला.

या सर्व घडामोडी सुरु असताना मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेवक असलेले संजय तुर्डे यांनी महापौर आणि पालिका आयुक्तांना एक पत्र दिले आहे. या पत्रात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांचा आपल्याला अभिमान असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशवासीय म्हणून खंभीरपणे उभे राहण्याच्या भावनेतून आपण आपले वर्षभराचे नगरसेवकपदाचे मानधन देत असल्याचे नमूद केले आहे. आपल्या या विनंतीचा त्वरित विचार करून तातडीने त्याची अमंलबजावणी करावी आणि सदर निधी संबंधितांपर्यंत पोहचता करावा अशी विनंती तुर्डे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

किती मानधन दिले -
मुंबई महानगरपालिकेच्या एका नगरसेवकाला दरमहा २५ हजार रुपये मानधन दिले जाते. एका वर्षात नगरसेवकाला ३ लाख रुपये मानधन स्वरूपात मिळतात. हे मानधन म्हणून मिळणारे ३ लाख रुपये संजय तुर्डे यांनी शहीद जवानांना दिले आहेत.

सोबत संजय तुर्डे यांचा फोटो आणि पात्राची प्रत पाठवली आहे....
बाईट भेटली कि पाठवतो .... Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.