ETV Bharat / state

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा म्हाडा करणार पुनर्विकास - उदय सामंत - dangerous building

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता म्हाडा या इमारतींची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे त्यामधील अनेक अडचणी दूर होणार आहेत. तसेच या माध्यमातून मुंबईतील लाखो लोकांना त्याचा लाभ होणार असल्याचे सामंत म्हणाले.

पत्रकारपरिषदेत बोलताना म्हाडा अध्यक्ष उदय सामंत
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:26 PM IST

मुंबई - शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. आज पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

पत्रकारपरिषदेत बोलताना म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता म्हाडा या इमारतींची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे त्यामधील अनेक अडचणी दूर होणार आहेत. तसेच या माध्यमातून मुंबईतील लाखो लोकांना त्याचा लाभ होणार असल्याचे सामंत म्हणाले.

मुंबईत मोडकळीस आलेल्या आणि १९४० च्या पुर्वीच्या जुन्या इमारती इमारती आहेत. त्या केवळ दुरुस्ती करण्यापेक्षा कायमस्वरूपी मार्ग निघावा म्हणून सेज इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे. त्यांची डागडुजी करण्यापेक्षा आता त्यांचा पुनर्विकास करणे हाच त्यावर मार्ग आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच धोरण आणले जाणार आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भात एक आठ आमदारांची समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धोरण आणणार असल्याचे जाहीर केले.

मुंबईत सी-१ म्हणजेच धोकादायक इमारतींमधून लोकांना बाहेर काढले जाणार आहे. त्या लोकांना ट्रांझिस्ट कॅम्प मध्ये राहण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. ज्यांना त्याठिकाणी जागा मिळाली नाही त्यांना भाडे देऊन दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचा निर्यण झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

डोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हती. त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ही एका खासगी ट्रस्टच्या मालकीची इमारत आहे. अतिधोकादायक अशा २३ इमारतींचा विकास करण्याचे प्रस्ताव आहे. त्याला सर्वात आधी प्राथमिकता दिली जाणार आहे. धोकादायक असलेल्या सर्व इमारतींचा पुनर्विकास म्हाडाकडून केला जाणार आहे. तसेच या इमारतींचे ऑडीट देखील तत्काळ करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबई - शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. आज पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

पत्रकारपरिषदेत बोलताना म्हाडा अध्यक्ष उदय सामंत

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता म्हाडा या इमारतींची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे त्यामधील अनेक अडचणी दूर होणार आहेत. तसेच या माध्यमातून मुंबईतील लाखो लोकांना त्याचा लाभ होणार असल्याचे सामंत म्हणाले.

मुंबईत मोडकळीस आलेल्या आणि १९४० च्या पुर्वीच्या जुन्या इमारती इमारती आहेत. त्या केवळ दुरुस्ती करण्यापेक्षा कायमस्वरूपी मार्ग निघावा म्हणून सेज इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे. त्यांची डागडुजी करण्यापेक्षा आता त्यांचा पुनर्विकास करणे हाच त्यावर मार्ग आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच धोरण आणले जाणार आहे. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भात एक आठ आमदारांची समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धोरण आणणार असल्याचे जाहीर केले.

मुंबईत सी-१ म्हणजेच धोकादायक इमारतींमधून लोकांना बाहेर काढले जाणार आहे. त्या लोकांना ट्रांझिस्ट कॅम्प मध्ये राहण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. ज्यांना त्याठिकाणी जागा मिळाली नाही त्यांना भाडे देऊन दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचा निर्यण झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

डोंगरी येथे कोसळलेली इमारत म्हाडाची नव्हती. त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ही एका खासगी ट्रस्टच्या मालकीची इमारत आहे. अतिधोकादायक अशा २३ इमारतींचा विकास करण्याचे प्रस्ताव आहे. त्याला सर्वात आधी प्राथमिकता दिली जाणार आहे. धोकादायक असलेल्या सर्व इमारतींचा पुनर्विकास म्हाडाकडून केला जाणार आहे. तसेच या इमारतींचे ऑडीट देखील तत्काळ करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Intro:म्हाडा करणार मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास - उदय सामंत
Body:
म्हाडा करणार मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास - उदय सामंत


यासाठी मोजोवर बाईट पाठवले आहे ते घ्यावेत

Slug : mh-mum-mhada-udaysamant-byte-7201153


मुंबई, ता. १७ :

मुंबई मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला असून त्या निर्णया नुसार मुंबईत मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाईल अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होते मात्र आता म्हाडा यासाठीची जबाबदारी घेणार असल्याने त्यातील अनेक अडचणी दूर होणार असून या माध्यमातून मुंबईतील लाखो लोकांना त्याचा लाभ होणार असल्याचे सामंत म्हणाले.
मुंबईत मोडकळीस आलेल्या व १९४० च्या पुर्वीच्या आणि सेस (जुन्या इमारती) इमारती आहेत. त्या आम्ही केवळ दुरुस्ती करण्यापेक्षा कायमस्वरूपी मार्ग निघावा महणून
सेज इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाणार आहे. त्यांची डागडुजी करण्यापेक्षा आता त्यांचा पुनर्विकास करणे हाच त्यावर मार्ग असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच धोरण आणले जाणार असून त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या संदर्भात एक आठ आमदारांची समिती नेमली होती, त्या समितीने केलेल्या शिफारशी आज मुख्यमंत्र्यांनी स्वीकारत त्यासाठी धोरण आणले जाण्याचे जाहीर केले.
मुंबईत ज्या सी वन म्हणजे धोकादायक आहेत त्या इमारतीतील लोकांना बाहेर काढले जाणार आहे, त्यानंतर त्यांचा विकास करायचा आहे. बाहेर काढून त्यांना ट्रांझिस्ट कॅम्प मध्ये आणि ज्यांना तिथे जागा मिळणार नाही त्यांना दुसरीकडे त्यांना भाडे देण्याचा निर्णय झाला असल्याचे सामंत म्हणाले.
काल डोंगरी येथे झालेल्या इमारतीत आमची इमारत नव्हती, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. त्यातही इमारत असेल तर आम्ही जबाबदारी झटकत नाही, ही एका ट्रस्ट ची इमारत आहे, मात्र आम्ही ती जबाबदारी नाकारत नाही, अतिधोकादायक अशा २३ इमारतीचे आमच्याकडे विकास करण्याचे प्रस्तावित आहे.त्याला सर्वात अगोदर प्राथमिकता दिली जाणार आहे., त्यात ज्या धोकादायक आहेत
या सगळ्या इमारतीचा पुनर्विकास म्हाडा कडून केला जाईल, आणि अशा या इमारतीचे ऑडिट तात्काळ केला जाणार जाईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.