मुंबई - रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवड योग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र, अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. ( Farmers can not afford fertilizers ) त्यामुळे या खतांच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे ( Minister Dada Bhuse ) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविया ( Union Minister Mansukh Mandviya ) यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात काय?
रब्बी हंगाम सध्या जोरात चालू आहे. अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्र राज्याचे लागवडी योग्य क्षेत्र वाढले असल्याने खताची मागणी जास्त आहे. अलीकडे अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्या असल्याने एवढी महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. राज्यात अधिकाधिक अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे खतांच्या किमती पूर्ववत कराव्यात. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी मंत्री भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
हेही वाचा - MPSC's Online Application : पुन्हा तांत्रिक अडचण; एमपीएससीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया स्थगित
खत उत्पादकांनी राज्यात ६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार खतांची विक्री करावी. सुरळीत पुरवठा राखण्यासाठी आणि खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक पावले केंद्र सरकारने उचलावीत आणि रब्बी हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही भुसे यांनी पत्रात नमूद केले आहे.
राज्यात ०६ डिसेंबर, २०२१ रोजी घोषित केलेल्या दरांनुसार प्रती ५० किलो बॅगचा खतनिहाय दर आणि झालेली वाढ - कंसात नमूद दर दिनांक १३ जानेवारी, २०२२ रोजीचे
- १०:२६:२६- १४४० ते १४७० (१४४० ते १६४०). वाढ: १७० रुपये
- १२:३२:१६- १४५० ते १४९० (१४५० ते १६४०) वाढ: १५० रुपये
- १६:२०:०:१३ - १०७५ ते १२५० (११२५ ते १२५०) वाढ: ५० रुपये
- अमोनियम सल्फेट: ८७५ (१०००) वाढ: १२५
- १५:१५:१५:०९ - ११८० ते १४५० (१३७५ ते १४५०) वाढ:१९५