मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजेच 'कॅब' केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतर या विरोधात आता आंदोलन केली जात आहेत. कॅब विधेयक हे मुस्लीम समाजासह अनेक धर्म व गरिबांविरोधी असून या विधेयकामुळे कलम 14, 15 आणि कलम 25 चे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
'कॅब'चा मुस्लिमांसह अनेक धर्म, गरिबांना सहन करवा लागणार त्रास
नागरिकता दुरूस्ती विधेयक भारतीय संविधानाच्या विरोधात असून याचा त्रास मुस्लिमांसह अनेक धर्म आणि गरिबांना होणार असल्याची प्रतिक्रीया आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी दिली.
!['कॅब'चा मुस्लिमांसह अनेक धर्म, गरिबांना सहन करवा लागणार त्रास ईटीव्ही भारतशी बोलताना अधिकारी अब्दूर रहमान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5372643-thumbnail-3x2-arehman.jpg?imwidth=3840)
नागरिकता दुरुस्ती विधेयक हे भारतीय संविधानाच्या विरोधात असून हे विधेयक केवळ मुस्लीम समाजासोबत भेदभाव करणारे नसून दलित, ओबीसी व दारिद्र्य रेषेखालील समाजावर अन्याय करणारा आहे, असे अब्दूर रहमान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
हेही वाचा - ''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'
मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजेच 'कॅब' केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतर या विरोधात आता आंदोलन केली जात आहेत. कॅब विधेयक हे मुस्लीम समाजासह अनेक धर्म व गरिबांविरोधी असून या विधेयकामुळे कलम 14, 15 आणि कलम 25 चे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नागरिकता दुरुस्ती विधेयक हे भारतीय संविधानाच्या विरोधात असून हे विधेयक केवळ मुस्लीम समाजासोबत भेदभाव करणारे नसून दलित, ओबीसी व दारिद्र्य रेषेखालील समाजावर अन्याय करणारा आहे, असे अब्दूर रहमान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
हेही वाचा - ''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'
Body:अब्दूर रहमान १९९७ बँचचे आयपीएस अधिकारी आहेत. अब्दूर रहमान यांची वायरलेस उपमहानिरीक्षक पदावररुन बढती होऊन मानवी हक्क आयोगाचे महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली होती. काही महिन्यांपूर्वी अब्दूर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्ती साठी अर्ज केला होता, मात्र काही तांत्रिक कारणामुळे तो मंजूर करण्यात आला नव्हता. मात्र यावेळी कॅब ला वितोध दर्शवित त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात त्यांच्याशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी
( 121 हिंदीत दिला आहे.)
Conclusion: