मुंबई -राज्यातील किल्ल्यांचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसेच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. या निर्णयावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला एवढीच भीक लागली असेल तर वर्षा बंगला व मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही; सरकारचे स्पष्टीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आले. त्यांचेच गड किल्ले भाड्याने देऊन सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे ,असेही देशपांडे म्हणाले. दरम्यान, सरकारने गड किल्ले भाड्याने देण्याचे धोरण ठरवल्यावर सर्वच स्तरातून पर्यटन मंत्री रावल व सरकारवर टीकेची झोड उठत आहे.