ETV Bharat / state

मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; १३०० नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी

author img

By

Published : Sep 4, 2019, 9:02 AM IST

Updated : Sep 4, 2019, 11:57 PM IST

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच हा पाऊस पुढील 4 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

मुंबई - शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. पुढील 4 दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; अनेक ठिकाणी वाहतूक बंद

live updates -

  • 11.56 PM - रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरू
  • 07.52 PM - ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सुरू आहे.
  • 07.52 PM - वसई आणि विरार दरम्यान सेवा पूर्णपणे बंद
  • 07.52 PM - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, गोरेगाव, अंधेरी सेवा बंद, तर तर वाशी पनवेल सेवा सुरू
  • 07.52 PM - ठाणे ते कर्जत, कसारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे सुरू आहेत.
  • 07.52 PM - मध्ये रेल्वेची ठाणे आणि सीएसएमटी सेवा ठप्प
  • 06.58 PM - विरार ते वसई दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्यामूळे लोकल सेवा बंद
  • 04.06 PM- मुंबई पूर्व उपनगरात पावसाने घेतली विश्रांती
  • 02.30 PM - महापालिका प्रशासन, अग्नीशमन दल, एनडीआरएफ आणि नेव्हीची पथके मिठी नदी परिसरात बोटीने गस्त घालत आहेत.
  • 12.49 PM - एनडीआरएफच्या मदतीने १३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
  • 12.16 PM - मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. एनडीआरएफचे एक पथक कुर्ला येथीस बैल बाजाराकडे रवाना करण्यात आले.
  • 12.00 PM - मुंबईत २४९ मिलीमीटर पावसाची नोंद

पावसामुळे सायन, माटूंगा, दादर या परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतूकीला देखील बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे, हॉर्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस 4 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाण्यात पावसाचे थैमान; रेल्वेसह जनजीवन विस्कळीत

मुंबईमध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. गणेशोत्सव सुरू असताना शाळांना 5 दिवासाची सुट्टी असते. त्यातही काही शाळा सुरू असतात. मात्र, त्या शाळांना देखील सुट्टी देण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहे.

सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान एका तासात झालेली पावसाची नोंद -

  • भांडूप कॉम्प्लेक्स - 14 मिमी
  • बिल्डिंग प्रपोजल ऑफिस - 13 मिमी
  • चेंबूर एम वेस्ट वॉर्ड ऑफिस - 11.44 मिमी
  • दहिसर फायर स्टेशन - 12 मिमी
  • अंधेरी वेस्ट कार्यालय - 11 मिमी

मंगळवारी रात्रीपासूनच पाऊस असल्याने माटुंगा गांधी मार्केट येथे पाणी भरले होते. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक वळवण्यात आली होती. वाहतूक सकाळी 6 वाजून 45 मिनिटांपासून पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, कांदिवली, कुर्ला एलबीएस रोड आणि हिंदमाता येथे पाणी साचले आहे.

मुंबई - शहरात मंगळवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला आहे. पुढील 4 दिवस पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पूरस्थिती; अनेक ठिकाणी वाहतूक बंद

live updates -

  • 11.56 PM - रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरू
  • 07.52 PM - ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा सुरू आहे.
  • 07.52 PM - वसई आणि विरार दरम्यान सेवा पूर्णपणे बंद
  • 07.52 PM - हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, गोरेगाव, अंधेरी सेवा बंद, तर तर वाशी पनवेल सेवा सुरू
  • 07.52 PM - ठाणे ते कर्जत, कसारा, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे सुरू आहेत.
  • 07.52 PM - मध्ये रेल्वेची ठाणे आणि सीएसएमटी सेवा ठप्प
  • 06.58 PM - विरार ते वसई दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्यामूळे लोकल सेवा बंद
  • 04.06 PM- मुंबई पूर्व उपनगरात पावसाने घेतली विश्रांती
  • 02.30 PM - महापालिका प्रशासन, अग्नीशमन दल, एनडीआरएफ आणि नेव्हीची पथके मिठी नदी परिसरात बोटीने गस्त घालत आहेत.
  • 12.49 PM - एनडीआरएफच्या मदतीने १३०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
  • 12.16 PM - मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली. एनडीआरएफचे एक पथक कुर्ला येथीस बैल बाजाराकडे रवाना करण्यात आले.
  • 12.00 PM - मुंबईत २४९ मिलीमीटर पावसाची नोंद

पावसामुळे सायन, माटूंगा, दादर या परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा फटका रस्ते व रेल्वे वाहतूकीला देखील बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे, हॉर्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस 4 दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाण्यात पावसाचे थैमान; रेल्वेसह जनजीवन विस्कळीत

मुंबईमध्ये पावसाचा जोर आजही कायम आहे. तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडणार आहे. गणेशोत्सव सुरू असताना शाळांना 5 दिवासाची सुट्टी असते. त्यातही काही शाळा सुरू असतात. मात्र, त्या शाळांना देखील सुट्टी देण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहे.

सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान एका तासात झालेली पावसाची नोंद -

  • भांडूप कॉम्प्लेक्स - 14 मिमी
  • बिल्डिंग प्रपोजल ऑफिस - 13 मिमी
  • चेंबूर एम वेस्ट वॉर्ड ऑफिस - 11.44 मिमी
  • दहिसर फायर स्टेशन - 12 मिमी
  • अंधेरी वेस्ट कार्यालय - 11 मिमी

मंगळवारी रात्रीपासूनच पाऊस असल्याने माटुंगा गांधी मार्केट येथे पाणी भरले होते. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक वळवण्यात आली होती. वाहतूक सकाळी 6 वाजून 45 मिनिटांपासून पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र, कांदिवली, कुर्ला एलबीएस रोड आणि हिंदमाता येथे पाणी साचले आहे.

Intro:मुंबईत पाऊस सुरूच अनेक सखल भागात पाणी;वाहतुकीवर देखील परिणाम


मुंबईत काळापासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तसेच मध्यरात्रीपासून मुंबईत सलग पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागात थोड्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. व या पावसाचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील होताना दिसत आहे. हा पाऊस असा चार दिवस पुढे राहणार आहे असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मध्यरात्रीपासूनच पाऊस कोसळत असल्याने नागरिक सकाळी बाहेर कमी प्रमाणात पडलेले आहेत.


Body:मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक सखल भागात पाणी थोड्या प्रमाणात साचलेले आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर मुंबईची तुंबई होण्याचे चिन्ह दिसत आहे. मुंबईत पाऊस कमी जास्त होत असल्याने सायन ,माटूंगा ,दादर या परिसरात सखल भागात पाणी साचत आहे ,कमी होत आहे असे चित्र आहे. या पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीला देखील बसलेला आहे .पावसामुळे मध्य रेल्वे हरबर रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने आहे .मुंबईतील बऱ्याच भागात गणेश चतुर्थीच्या सणाची रेलचेल आहे .त्यामध्येच पावसानी मोठी हजेरी लावल्यामुळे सणाच्या आनंदाला पावसाने चिडचिड केलेली आहे.


Conclusion:हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस असेच चार दिवस राहणार आहे .त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावा असं चित्र आहे.
Last Updated : Sep 4, 2019, 11:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.