ETV Bharat / state

राज्यात आणखी ३ कोरोनाबाधित आढळले, रुग्णांची संख्या १४ वर

author img

By

Published : Mar 13, 2020, 9:45 PM IST

आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आत्तापर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर, १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई - राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण(वय ३३) पुणे येथील त्याने अमेरिकेला प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण(वय ३५) हा ठाण्यातील रहिवासी असून फ्रान्सवरून आला आहे. सध्या त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तिसरा रुग्ण(वय ६४) हा दुबईवरून आलेला असून हिंदूजा येथे भरती आहे. या तिघांचेही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना विषाणुची बाधा झाली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत क्रिटिकल स्टेजमध्ये असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या सर्व करोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले.

आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन'द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या ३ देशात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आत्तापर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर, १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ संशयित रुग्ण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

हेही वाचा - COVID-19 : मुंबईतील 'त्या' रुग्णांच्या निकटवर्तीयांची चाचणी 'निगेटिव्ह'

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाट उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा - मुंबई सेंट्रल स्थानकाला समाजसेवक नाना शंकरशेठ यांचे नाव; मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई - राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण(वय ३३) पुणे येथील त्याने अमेरिकेला प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण(वय ३५) हा ठाण्यातील रहिवासी असून फ्रान्सवरून आला आहे. सध्या त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तिसरा रुग्ण(वय ६४) हा दुबईवरून आलेला असून हिंदूजा येथे भरती आहे. या तिघांचेही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना विषाणुची बाधा झाली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत क्रिटिकल स्टेजमध्ये असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या सर्व करोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले.

आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन'द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या ३ देशात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आत्तापर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमूने निगेटिव्ह आले आहेत. तर, १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ संशयित रुग्ण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.

हेही वाचा - COVID-19 : मुंबईतील 'त्या' रुग्णांच्या निकटवर्तीयांची चाचणी 'निगेटिव्ह'

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाट उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला असल्याची त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा - मुंबई सेंट्रल स्थानकाला समाजसेवक नाना शंकरशेठ यांचे नाव; मंत्रिमंडळाची मंजुरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.