ETV Bharat / state

जयंत पाटील यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jun 26, 2019, 9:56 PM IST

जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघातून त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. केवळ राजकारण म्हणून ते आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी संगीतले आहे.

चंद्रकांत पाटील

मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी विधानसभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुरवणी मागण्यांवर बोलताना नियमबाह्य आरोप केल्याने गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेताना

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जयंत पाटील यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी केलेले आरोप सभागृहच्या पटलावरन काढून टाकण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार पाटील यांनी केलेले आरोप पटलावरून काढवून टाकण्यात आले. मात्र, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा आरोप केले.

जयंत पाटील यांच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाटील यांनी अर्धन्यायिक प्रकरणाबाबत आरोप केले आहेत. ते ग्राह्य धरता येत नाहीत. तसेच सभागृहात आरोप करण्याआधी त्यांनी अध्यक्षांना नोटीस वेळेत दिली नाही. त्यामुळे त्यांचे आरोप काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार आहे, असे ते म्हणाले.

जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातून त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. केवळ राजकारण म्हणून ते आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, संसदीय आयुध वापरून हा मुद्दा गुरुवारी पुन्हा विधानसभेत मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितल्याने पुन्हा सभागृहात गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी विधानसभेत भ्रष्टाचाराचे आरोप केले. पुरवणी मागण्यांवर बोलताना नियमबाह्य आरोप केल्याने गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेताना

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जयंत पाटील यांनी कोणतीही नोटीस दिली नाही. त्यामुळे पाटील यांनी केलेले आरोप सभागृहच्या पटलावरन काढून टाकण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार पाटील यांनी केलेले आरोप पटलावरून काढवून टाकण्यात आले. मात्र, जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा आरोप केले.

जयंत पाटील यांच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाटील यांनी अर्धन्यायिक प्रकरणाबाबत आरोप केले आहेत. ते ग्राह्य धरता येत नाहीत. तसेच सभागृहात आरोप करण्याआधी त्यांनी अध्यक्षांना नोटीस वेळेत दिली नाही. त्यामुळे त्यांचे आरोप काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार आहे, असे ते म्हणाले.

जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातून त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. केवळ राजकारण म्हणून ते आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, संसदीय आयुध वापरून हा मुद्दा गुरुवारी पुन्हा विधानसभेत मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितल्याने पुन्हा सभागृहात गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे.

Intro:जयंत पाटील यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार- जयंत पाटील

मुंबई 26

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना नियमबाह्य आरोप केल्याने गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल मंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुण्यातील जमिनीच्या व्यवहारात राज्य सरकारचा शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जयंत पाटील यांनी कोणतीही नोटीस दिली नाही.त्यामुळे पाटील यांनी केलेले आरोप सभागृहच्या पटलावरन काढून टाकण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार पाटील यांनी केलेले आरोप पटलावरून काढवून टाकण्यात आले. मात्र जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले.

जयंत पाटील यांच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाटील यांनी अर्धन्यायिक प्रकरणाबाबत आरोप केले आहेत.ते ग्राह्य धरता येत नाहीत.तसेच सभागृहात आरोप करण्याआधी त्यांनी अध्यक्षाना नोटस वेळेत दिली नाही. त्यामुळे त्यांचे आरोप काढून टाकण्यात आले आहेत.मात्र त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत नियमबाह्य आरोप केले आहेत. त्यांनी त्यासंदर्भात अध्यक्षांना कोणतीही नोटीस आधी दिली नाही. सभागृहातल्या भाषणा नंतर त्यांनी अध्यक्षांना आरोप करणार असल्याची नोटीस दिली आहे. हे नियमबाह्य आहे. मात्र मी त्यांच्या आरोपांना उत्तर देणार आहे. तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ही दाखल करेन. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघातून त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये सामील होत असल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे. केवळ राजकारण म्हणून ते आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी संगीतले आहे. दरम्यान संसदीय आयुध वापरून हा मुद्दा गुरुवारी पुन्हा विधानसभेत मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनीं सांगितल्याने पुन्हा सभागृहात गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.