ETV Bharat / state

Water Tax in Mumbai मुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी

author img

By

Published : Dec 21, 2022, 8:01 AM IST

मुंबई पालिकेने २०२२-२३ मध्ये पाणीपट्टीचा ७.१२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ( hike in water tax by BMC ) मंजूर केला आहे. पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते. मात्र, मुंबईत २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याने ( water bill in Mumbai ) पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती .

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना मुंबईकर नागरिकांना आणखी महागाईला समोर जावे ( inflation in Mumbai ) लागणार आहे. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत सन २०२२-२३ मध्ये ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीला पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल ( BMC commissioner sanction new water tax ) यांनी मंजुरी दिली आहे.

पाणी पट्टीत वाढ का? मुंबई महापालिकेने २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने अनुमती दिली होती. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी शासनाला देण्यात येणारे पैसे, तसेच इतर देखभाल खर्च याची सर्व गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला ( BMC expenditure on water supply ) जातो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष पाणी पट्टी, मालमत्ता कर इतर करात पालिकेने वाढ केली नव्हती. मात्र मुंबईकरांना मिळणाऱ्या पाण्याचा दर्जा आणि उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा पाहिल्यास त्यासाठी आकारण्यात येणारे दर तुलनेने कमी आहे. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यासाठी होणारा खर्च जास्त आहे. यामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दरवाढ केली जाते.



इतका खर्च वाढला : मुंबईत २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याने पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी २०२१ ला ५.२९ टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र कोरोना आणि पालिकेच्या निवडणुका असल्याने करवाढ करू नये असे अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. यामुळे दरवाढ करण्यात आली नव्हती. आता पालिकेच्या जल विभागाचा आस्थापना खर्च ५१८ वरून ५७७ रुपयांपर्यंत वाढला आहे. तर प्रशासकीय खर्च १२५ रुपयांवरून घटून ८५ रुपये झाला आहे. विद्युत खर्च २२१ रुपयांवरून २२२ रुपये झाला आहे. तर सरकारी तलावांतून घेण्यात येणार्‍या पाण्याचा खर्च ८७ रुपयांवरून १०१ रुपये झाला आहे. तर इतर प्रचालन व परीरक्षण खर्च ८१ रुपयांवरुन १२०.४८ टक्के झाला म्हणजेच ४८.७४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.



अशी होणार पाणी पट्टीत वाढ : मुंबई पालिकेने २०२२-२३ मध्ये पाणीपट्टीचा ७.१२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी ४.९३ रुपयांवरून ५.२८ रुपये होणार आहे. इमारतींची पाणीपट्टी ५.९४ रुपयांवरून ६.३६ रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी २३.७७ रुपयोवरून २५.२६ रुपये होणार आहे. व्यवसायिक विभागात ४४.५८ रुपयांवरून ४७.६५ रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यांसाठी ५९.४२ रुपयांवरून ६३.६५ रुपये आणि रेसकोर्स व फाइव्ह स्टार हॉटेलसाठी ८९.१४ रुपयांवरून ९५.४९ इतकी पाणीपट्टी वाढणार आहे. दरम्यान, मलनिस्सारण प्रती एक हजार लिटर साठी ४.७६ रुपये आकारण्यात येणार आहे.



अशी आहे दरवाढ (प्रति हजार लिटर) झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे : ४.७६ पैसे, झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती ५.२८ पैसे, व्यावसायिक ग्राहकांसाठी ४७.७५ पैसे, बिगर व्यापारी संस्था २५.४६ पैसे, उद्योगधंदे, कारखाने ६३ ६५ पैसे, रेसकोर्स, तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल ९५.४९ पैसे, बाटलीबंद पाणी कंपन्या १३२.६४ पैसे

मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना मुंबईकर नागरिकांना आणखी महागाईला समोर जावे ( inflation in Mumbai ) लागणार आहे. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत सन २०२२-२३ मध्ये ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीला पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल ( BMC commissioner sanction new water tax ) यांनी मंजुरी दिली आहे.

पाणी पट्टीत वाढ का? मुंबई महापालिकेने २०१२ मध्ये पाणीपट्टीत प्रत्येक वर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेने अनुमती दिली होती. या धोरणाच्या आधारे पालिका प्रशासनाकडून दरवर्षी पाणीपट्टीत वाढ केली जाते. आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी शासनाला देण्यात येणारे पैसे, तसेच इतर देखभाल खर्च याची सर्व गोळाबेरीज करून पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार केला ( BMC expenditure on water supply ) जातो. कोरोनामुळे मागील दोन वर्ष पाणी पट्टी, मालमत्ता कर इतर करात पालिकेने वाढ केली नव्हती. मात्र मुंबईकरांना मिळणाऱ्या पाण्याचा दर्जा आणि उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा पुरवठा पाहिल्यास त्यासाठी आकारण्यात येणारे दर तुलनेने कमी आहे. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यासाठी होणारा खर्च जास्त आहे. यामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दरवाढ केली जाते.



इतका खर्च वाढला : मुंबईत २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याने पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी २०२१ ला ५.२९ टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र कोरोना आणि पालिकेच्या निवडणुका असल्याने करवाढ करू नये असे अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. यामुळे दरवाढ करण्यात आली नव्हती. आता पालिकेच्या जल विभागाचा आस्थापना खर्च ५१८ वरून ५७७ रुपयांपर्यंत वाढला आहे. तर प्रशासकीय खर्च १२५ रुपयांवरून घटून ८५ रुपये झाला आहे. विद्युत खर्च २२१ रुपयांवरून २२२ रुपये झाला आहे. तर सरकारी तलावांतून घेण्यात येणार्‍या पाण्याचा खर्च ८७ रुपयांवरून १०१ रुपये झाला आहे. तर इतर प्रचालन व परीरक्षण खर्च ८१ रुपयांवरुन १२०.४८ टक्के झाला म्हणजेच ४८.७४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला होता. या प्रस्तावाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.



अशी होणार पाणी पट्टीत वाढ : मुंबई पालिकेने २०२२-२३ मध्ये पाणीपट्टीचा ७.१२ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार प्रति एक हजार लिटरमागे झोपडपट्टी विभागाची पाणीपट्टी ४.९३ रुपयांवरून ५.२८ रुपये होणार आहे. इमारतींची पाणीपट्टी ५.९४ रुपयांवरून ६.३६ रुपये होणार आहे. नॉन कमर्शिअल विभागाची पाणीपट्टी २३.७७ रुपयोवरून २५.२६ रुपये होणार आहे. व्यवसायिक विभागात ४४.५८ रुपयांवरून ४७.६५ रुपये होणार आहे. उद्योग कारखान्यांसाठी ५९.४२ रुपयांवरून ६३.६५ रुपये आणि रेसकोर्स व फाइव्ह स्टार हॉटेलसाठी ८९.१४ रुपयांवरून ९५.४९ इतकी पाणीपट्टी वाढणार आहे. दरम्यान, मलनिस्सारण प्रती एक हजार लिटर साठी ४.७६ रुपये आकारण्यात येणार आहे.



अशी आहे दरवाढ (प्रति हजार लिटर) झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे : ४.७६ पैसे, झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती ५.२८ पैसे, व्यावसायिक ग्राहकांसाठी ४७.७५ पैसे, बिगर व्यापारी संस्था २५.४६ पैसे, उद्योगधंदे, कारखाने ६३ ६५ पैसे, रेसकोर्स, तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल ९५.४९ पैसे, बाटलीबंद पाणी कंपन्या १३२.६४ पैसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.