ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : मुंबईतून पहिल्यांदाच दिव्यांग व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात, यांच्याकडून भरला उमेदवारी अर्ज

दुर्बल विकास आघाडी समाजासाठी काहीतरी चांगले काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल व्यक्तींना उमेदवारी देत आहे.

author img

By

Published : Apr 10, 2019, 5:40 PM IST

राजेश दयाळ

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या देशभरात सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुंबई दक्षिण मतदार संघात मुंबईतील इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक दिव्यांग (अंध) उमेदवार मैदानात आहे. दुर्बल विकास आघाडीकडून राजेश दयाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजेश दयाळ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देत आहे. मात्र, दुर्बल विकास आघाडी समाजासाठी काहीतरी चांगले काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल व्यक्तींना उमेदवारी देत आहे. त्यांनी मुंबईत दयाळ यांना तसेच घाटकोपर येथून एका तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

राजेश दयाळ

राजेश दयाळ हे १२ वी शिक्षित उमेदवार आहेत. ते बी. कॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. मुंबईत पहिल्यांदाच एक दिव्यांग उमेदवार दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर शिवसेना आणि काँग्रेसचे तगडे उमेदवार आहेत. त्यामध्ये दुर्बल विकास आघाडीने हा दिव्यांग उमेदवार उभा केला आहे. तर या मतदार संघात एक वेगळेच राजकारण पाहायला मिळणार आहे.

सध्या देशभर घराणेशाही सुरू आहे. ही घराणेशाही मोडकळीस आणण्यासाठी व दुर्बल व्यक्तींवर अन्याय रोखण्यासाठी तसेच लोकसभेत दुर्बलांचे तसेच सामन्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया राजेश दयाळ यांनी दिली. माझ्यासारख्या बहुजनातील वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी, बळीराजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, अशी प्रतिक्रिया दिव्यांग राजेश दयाळ यांनी दिली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या देशभरात सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुंबई दक्षिण मतदार संघात मुंबईतील इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक दिव्यांग (अंध) उमेदवार मैदानात आहे. दुर्बल विकास आघाडीकडून राजेश दयाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राजेश दयाळ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देत आहे. मात्र, दुर्बल विकास आघाडी समाजासाठी काहीतरी चांगले काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल व्यक्तींना उमेदवारी देत आहे. त्यांनी मुंबईत दयाळ यांना तसेच घाटकोपर येथून एका तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

राजेश दयाळ

राजेश दयाळ हे १२ वी शिक्षित उमेदवार आहेत. ते बी. कॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. मुंबईत पहिल्यांदाच एक दिव्यांग उमेदवार दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर शिवसेना आणि काँग्रेसचे तगडे उमेदवार आहेत. त्यामध्ये दुर्बल विकास आघाडीने हा दिव्यांग उमेदवार उभा केला आहे. तर या मतदार संघात एक वेगळेच राजकारण पाहायला मिळणार आहे.

सध्या देशभर घराणेशाही सुरू आहे. ही घराणेशाही मोडकळीस आणण्यासाठी व दुर्बल व्यक्तींवर अन्याय रोखण्यासाठी तसेच लोकसभेत दुर्बलांचे तसेच सामन्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया राजेश दयाळ यांनी दिली. माझ्यासारख्या बहुजनातील वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी, बळीराजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, अशी प्रतिक्रिया दिव्यांग राजेश दयाळ यांनी दिली.

Intro:लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच अंध उमेदवार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. पण मुंबई दक्षिण मतदार संघात संपूर्ण मुंबईत प्रथमच इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक अंध उमेदवार मैदानात आहे. दुर्बल विकास आघाडी कडून राजेश दयाळयांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कालच राजेश दयाळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवार शोधून त्याला उमेदवारी देत आहे. मात्र दुर्बल विकास आघाडी समाजाविषयी काहीतरी चांगले काम करु इच्छिणाऱ्या दुर्बल व्यक्तींना उमेदवारी संपूर्ण महाराष्ट्रभर उमेदवारी देण्याचा निश्चय करत मुंबईत दयाळ यांना तसेच घाटकोपर येथून त्यांचाचा आघाडीकडून एका तृतीयपंथीव्यक्तीला उमेदवारी दिली आहे.

राजेश दयाळ हे 12 वी शिक्षित उमेदवार आहेत. त्यांनी बीकॉम तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. मुंबईत पहिल्यांदाच इतिहासात एक अंध उमेदवार दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यासमोर शिवसेना ,व काँग्रेसचे तगडे उमेदवार आहेत त्यामध्ये दुर्बल विकास आघाडीने हा अंध उमेदवार उभा केला आहे तर या मतदार संघात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळणार आहे

सध्या घाणेरडं राजकारण सुरु असून घराणेशाही सुरु आहे. ही घराणेशाही मोडकळीस आणण्यासाठी व दुर्बल व्यक्तींवर अन्याय रोखण्यासाठी तसेच लोकसभेत दुरबळांचे तसेच सामन्यांचे प्रश्न मांडण्यासाठी माझी उमेदवारी असल्याची प्रतिक्रिया राजेश दयाळ यांनी दिली. माझ्यासारख्या बहुजनातील वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. बहुजनांना त्यांच्या न्याय हक्काची जाणीव करुण देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जे शेतकरी आत्महत्या करुन मरत आहेत, पण त्या शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे कोणी उभे राहत नाही, शेतकऱ्यांना मदत कोणी करत नाही, त्यांची समस्या कोणी जाणून घेत नाही, त्या बळीराजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे, अशी प्रतिक्रिया अंध राजेश दयाळ यांनी दिली.


Body:.Conclusion:विशेष बातमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.