ETV Bharat / state

पोलिसाला घाबरून आईच्या पदराखाली लपून बसणारे पुढे स्वातंत्र्य सैनिक झाले - बागडे - BJP

गावात पोलीस आले, की पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले, विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे वक्तव्य...म्हणाले, देशभक्ती व देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेला संघर्षाची माहिती तरुणांना दिली पाहिजे

बागडे
author img

By

Published : Mar 1, 2019, 5:29 PM IST

मुंबई - गावात पोलीस आले, की पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले, असल्याचे वक्तव्य विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाची युवा पिढीला माहिती मिळावी म्हणून स्वातंत्र सैनिक बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने सायन्स सर्कल येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.

हरिभाऊ बागडे

स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्या कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेतला त्यांना अजूनही स्वतंत्र सेनानी म्हणून मान्यता मिळत नाही. परंतु, गावात पोलीस आले की, पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले तेच पुढे स्वातंत्र्य सैनिक झाले, असे मी सभागृहात तावातावाने बोललो व त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळी त्या खात्याचे मंत्री पात्रावला होते. ते मुंबईचे होते. सभागृह संपल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली व माझ्याकडील सर्व कागदपत्रे नाव घेऊन सर्वांना पेन्शन व प्रमाणपत्रे दिली असल्याची आठवणही बागडे यांनी यावेळी सांगितली.

बागडे पुढे म्हणाले, जी काही स्वातंत्र्य सैनिकांची धग होती ती पुढे लुप्त होत गेली. पण त्यांचा लढा दुष्मनाच्या नाकी नऊ आणत होता. तेव्हा तरुण पिढीला अशा प्रकारच्या कार्यक्रम आयोजन करून देशभक्ती व देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेला संघर्षाची माहिती दिली पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी बागडे यांनी व्यक्त केली.

मुंबई - गावात पोलीस आले, की पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले, असल्याचे वक्तव्य विधासभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांच्या योगदानाची युवा पिढीला माहिती मिळावी म्हणून स्वातंत्र सैनिक बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने सायन्स सर्कल येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.

हरिभाऊ बागडे

स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्या कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेतला त्यांना अजूनही स्वतंत्र सेनानी म्हणून मान्यता मिळत नाही. परंतु, गावात पोलीस आले की, पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले तेच पुढे स्वातंत्र्य सैनिक झाले, असे मी सभागृहात तावातावाने बोललो व त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळी त्या खात्याचे मंत्री पात्रावला होते. ते मुंबईचे होते. सभागृह संपल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली व माझ्याकडील सर्व कागदपत्रे नाव घेऊन सर्वांना पेन्शन व प्रमाणपत्रे दिली असल्याची आठवणही बागडे यांनी यावेळी सांगितली.

बागडे पुढे म्हणाले, जी काही स्वातंत्र्य सैनिकांची धग होती ती पुढे लुप्त होत गेली. पण त्यांचा लढा दुष्मनाच्या नाकी नऊ आणत होता. तेव्हा तरुण पिढीला अशा प्रकारच्या कार्यक्रम आयोजन करून देशभक्ती व देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेला संघर्षाची माहिती दिली पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी बागडे यांनी व्यक्त केली.

Intro:गावात पोलीस आले की , पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले.
विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे

हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांचे योगदान नवीन पिढीला देशप्रेमा बाबत माहिती मिळावी म्हणून स्वातंत्र सैनिक बाबासाहेब परांजपे प्रतिष्टान आयोजित सायन सर्कल येथे चर्चा सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले . स्वातंत्र लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेतला त्याना स्वातंत्र्य सेनानी म्हणून आजुनही मान्यता मिळाली नाही.
Body:गावात पोलीस आले की , पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले पुढे तेच स्वातंत्र्य सैनिक झाले.
विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे

हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र सैनिकांचे योगदान नवीन पिढीला देशप्रेमा बाबत माहिती मिळावी म्हणून स्वातंत्र सैनिक बाबासाहेब परांजपे प्रतिष्टान आयोजित सायन सर्कल येथे चर्चा सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सभापती हरिभाऊ बागडे म्हणाले . स्वातंत्र लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग घेतला त्याना स्वातंत्र्य सेनानी म्हणून आजुनही मान्यता मिळाली नाही.

माझा एक नातेवाईक औरंगाबाद येथील साडेपाच महिने हर्सूल कारागृहात होता. पण त्याचे माझे विचार वेगळे असल्याने त्यांचे माझे काही जमायचे नाही.त्यावेळी मी एक कपात सूचना टाकली व मला कपात सुचनेत उत्तर देण्यात आले की, त्यांचे सहा महिने भरत नसल्याने त्याना पेन्शन देता येत नव्हते, परंतु सरकारी खाक्या असा असतो की , त्यानी मला कळवून टाकले तेंव्हा मी संबंधित मंत्र्याला गाठले तुम्ही पेन्शन भूमीगताला देता जो एक ही दिवस कारागृहात गेला नाही. त्यावेळी त्यानी त्याला भूमिगत पेन्शन दिले. असाच एक प्रश्न सभागृहात आला होता.स्वातंत्र्य सैनिकानी स्वातंत्र लढ्यात जे कोणी प्रत्येक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेतला त्याना अजूनही स्वतंत्र सेनानी म्हणून मान्यता मिळत नाही. परंतु गावात पोलीस आले की, पळत जाऊन आईच्या पदराखाली लपून बसले तेच पुढे स्वातंत्र सैनिक झाले.असे मी सभागृहात तावातावाने बोललो व त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळी त्या खात्याचे मंत्री पात्रावला होते ते मुंबईचे होते त्यानी सभागृह संपल्यानंतर ते मला भेटले व माझ्याकडील सर्व कागदपत्रे नाव घेऊन सर्वाना पेन्शन व प्रमाणपत्रे देण्यात आले असे सभापती म्हणाले.
जी काही स्वातंत्र्य सैनिकांची धग होती ती पुढे पुढे लुप्त होत गेली पण त्यांचा लढा दुष्मनाच्या नाकी नऊ आणत होता. तेंव्हा तरुण पिढी ही राज्यात इतरत्र मराठवाड्यातील कुठे स्थायिक झाली आहे त्यांना असा कार्यक्रम आयोजित करून देशभक्ती व देश स्वतंत्र करण्यासाठी लागलेला संघर्ष येणाऱ्या पिढीला समजलाच पाहिजे.अशी मी अपेक्षा यावेळी करतो.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.