ETV Bharat / state

मुंबईकरांनो घाबरून जाऊ नका, एकमेकांना मदत करा - आदित्य ठाकरेंचे आवाहन

author img

By

Published : Jul 2, 2019, 9:12 PM IST

मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणी साचले. त्यानंतर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठप्प झालेल्या मुंबईतील परिस्थितीचा पालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला.

आदित्य ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली

मुंबई - सलग तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, मुंबईकरांनी पॅनिक होऊ नका, एकमेकांना मदत करा, असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेवा युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली

मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणी साचले. त्यानंतर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठप्प झालेल्या मुंबईतील परिस्थितीचा पालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई महानगपालिकेची आपत्कालीन व्यवस्था ही इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार आहे. नाल्यांची क्षमता ही ५० मिमी एवढीच असते. तीस दिवसात पडणारा पाऊस केवळ तीन-चार दिवसात पडला असल्याने ही आपत्कालीन परिस्थिती ओढवली. गरज नसेल तर बाहेर पडू नका, पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असे त्यांनी म्हटले. मुंबईत पाणी उपसण्यासाठी महापालिकेने आणखी तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ही कामे पूर्ण होतील. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून एकमेकांची मदत करा, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. पावसाचा फटका प्रत्येकालाच बसत आहे. महापालिका हतबल आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जगातली कोणतीही महापालिका अशा आपत्कालीन परिस्थितीत काहीही वेगळे करू शकत नाही, असे सांगत ठाकरे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

मुंबई - सलग तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने मुंबईवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, मुंबईकरांनी पॅनिक होऊ नका, एकमेकांना मदत करा, असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेवा युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली

मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणी साचले. त्यानंतर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठप्प झालेल्या मुंबईतील परिस्थितीचा पालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबई महानगपालिकेची आपत्कालीन व्यवस्था ही इंटरनॅशनल स्टॅडर्डनुसार आहे. नाल्यांची क्षमता ही ५० मिमी एवढीच असते. तीस दिवसात पडणारा पाऊस केवळ तीन-चार दिवसात पडला असल्याने ही आपत्कालीन परिस्थिती ओढवली. गरज नसेल तर बाहेर पडू नका, पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असे त्यांनी म्हटले. मुंबईत पाणी उपसण्यासाठी महापालिकेने आणखी तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी ही कामे पूर्ण होतील. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून एकमेकांची मदत करा, असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी तसेच सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. पावसाचा फटका प्रत्येकालाच बसत आहे. महापालिका हतबल आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जगातली कोणतीही महापालिका अशा आपत्कालीन परिस्थितीत काहीही वेगळे करू शकत नाही, असे सांगत ठाकरे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.

Intro:मुंबई -
तीस दिवसांचा पाऊस तीन ते चार दिवसांत पडल्याने मुंबईवर आपत्ती ओढवली आहे. मात्र, मुंबईकरांनी पॅनिक होऊ नका, एकमेकांना मदत करा, असे आवाहन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मुंबईत गेले चार दिवस पाऊस पडत आहे. काल रात्री पडलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणी साचले. त्यानंतर ठप्प झालेल्या मुंबईचा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा पालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. Body:मुंबई महानगपालिकेची आपत्कालीन व्यवस्था ही इंटरनॅशनल स्टॅंडर्ड नुसार आहे. नाल्यांची क्षमता ही ५० मिमी एवढीच असते. तीस दिवसात पडणारा पाऊस केवळ तीन-चार दिवसात पडला, त्यामुळे ही आपत्कालीन परिस्थिती ओढवली. मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात येऊन पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईकरांना गरज नसेल तर बाहेर पडू नका, पॅनिक होऊ नका, एकमेकांची मदत करा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी कोणीही मॅनहोल उघडू नये असेही त्यांनी म्हटले. मुंबईत पाणी उपसण्यासाठी महापालिकेने आणखी तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ती पुढील वर्षी ही कामे पूर्ण होतील. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकर म्हणून एकमेकांची मदत करा, असा टोला विरोधकांना लगावला. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी हे मुंबईची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यरत आहेत. पावसाचा फटका प्रत्येकालाच बसला आहे. महापालिका हतबल आहे, असे मी म्हणणार नाही. कारण जगातली कोणतीही महापालिका अशा आपत्कालीन परिस्थितीत काहीही वेगळं करू शकत नाही, असे सांगत ठाकरे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.