ETV Bharat / state

Corona Update in Maharashtra : राज्यात कोरोनाचे ८५० नवे रुग्ण; ४ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 22, 2023, 9:10 PM IST

राज्यात दोन दिवस कोरोनाच्या एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. काल पासून त्यात घट झाली. आज (शनिवारी) ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ६४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात ५९७० ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यामधील ५७ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत.

Corona Update in Maharashtra
कोरोना

मुंबई: राज्यात आज ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ६१ हजार ३४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत तर १ लाख ४८ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १६,४१२ चाचण्या करण्यात आल्या.


साडे चार महिन्यात ८४ मृत्यू: १ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडे चार महिन्यात कोरोनामुळे ८४ मृत्यू झाले आहेत. त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७२.६२ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ८१ टक्के मृत्यू झाले आहेत. १२ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत.


५७ रुग्ण गंभीर: राज्यात २१ एप्रिल रोजी ५९७० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५६७८ म्हणजेच ९५.१ टक्के रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. २९२ टक्के ४.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २३५ म्हणजेच ३.९ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ५७ म्हणजेच १ टक्के रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.


मुंबईत १७७ रुग्ण, २ मृत्यू: मुंबईमध्ये आज १७७ रुग्णांची नोंद झाली आहे. २६४ रुग्ण बरे झाले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३७७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ३८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ६१ हजार ७४६ रुग्णांची, १९ हजार ७६० मृत्यूंची तर ११ लाख ४० हजार ६०९ बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.


राज्यात यादिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद:
१२ एप्रिल ११२५
१३ एप्रिल १०८६
१४ एप्रिल ११५२
१९ एप्रिल ११००
२० एप्रिल १११३

'इतके' करोड लोकं होते क्वारंटाईन: कोरोनामुळे मुंबईत तीन वर्षांत एक कोटी दहा लाख नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा लोकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संपर्कात आलेले लोक क्वारंटाईन : जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूने मुंबईवर मार्च २०२० मध्ये हल्ला केला. पाहता पाहता काही दिवसात हा विषाणू सर्वत्र पसरला. रुग्णसंख्या वाढू लागली त्याच सोबत मृत्यू होऊ लागले. यामुळे सरकाराच्या आदेशाप्रमाणे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा लोकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पालिकेने कोविड सेंटर सुरु केली आहे. नागरिकांना विभागात क्वारंटाईन करता यावे म्हणून शाळा, सभागृह आदी जागा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या गंभीर नसलेल्या रुग्णांना आणि संपर्कात आलेल्या लोकांना घरातच होम क्वारंटाईन केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: Heatstroke and Corona Deaths : राज्यात कोरोना वाढ अन् उष्माघात एकाचवेळी; मृत्यूचा आकडा शंभरी पार...

मुंबई: राज्यात आज ८५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ८१ लाख ६१ हजार ३४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८० लाख ६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत तर १ लाख ४८ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज १६,४१२ चाचण्या करण्यात आल्या.


साडे चार महिन्यात ८४ मृत्यू: १ जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडे चार महिन्यात कोरोनामुळे ८४ मृत्यू झाले आहेत. त्यामधील ६० वर्षांवरील नागरिकांचे ७२.६२ टक्के मृत्यू झाले आहेत. इतर आजार असलेल्या नागरिकांचे ८१ टक्के मृत्यू झाले आहेत. १२ टक्के मृत्यू सहबाधित नसलेल्या नागरिकांचे झाले आहेत.


५७ रुग्ण गंभीर: राज्यात २१ एप्रिल रोजी ५९७० सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ५६७८ म्हणजेच ९५.१ टक्के रुग्ण गृह विलागीकरणात आहेत. २९२ टक्के ४.९ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. २३५ म्हणजेच ३.९ टक्के रुग्ण सर्वसाधारण वार्डमध्ये उपचार घेत आहेत तर ५७ म्हणजेच १ टक्के रुग्ण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.


मुंबईत १७७ रुग्ण, २ मृत्यू: मुंबईमध्ये आज १७७ रुग्णांची नोंद झाली आहे. २६४ रुग्ण बरे झाले आहेत. २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३७७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ११६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून ३८ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ११ लाख ६१ हजार ७४६ रुग्णांची, १९ हजार ७६० मृत्यूंची तर ११ लाख ४० हजार ६०९ बरे झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.


राज्यात यादिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद:
१२ एप्रिल ११२५
१३ एप्रिल १०८६
१४ एप्रिल ११५२
१९ एप्रिल ११००
२० एप्रिल १११३

'इतके' करोड लोकं होते क्वारंटाईन: कोरोनामुळे मुंबईत तीन वर्षांत एक कोटी दहा लाख नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा लोकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संपर्कात आलेले लोक क्वारंटाईन : जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूने मुंबईवर मार्च २०२० मध्ये हल्ला केला. पाहता पाहता काही दिवसात हा विषाणू सर्वत्र पसरला. रुग्णसंख्या वाढू लागली त्याच सोबत मृत्यू होऊ लागले. यामुळे सरकाराच्या आदेशाप्रमाणे मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ नये म्हणून अशा लोकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पालिकेने कोविड सेंटर सुरु केली आहे. नागरिकांना विभागात क्वारंटाईन करता यावे म्हणून शाळा, सभागृह आदी जागा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या गंभीर नसलेल्या रुग्णांना आणि संपर्कात आलेल्या लोकांना घरातच होम क्वारंटाईन केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा: Heatstroke and Corona Deaths : राज्यात कोरोना वाढ अन् उष्माघात एकाचवेळी; मृत्यूचा आकडा शंभरी पार...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.