ETV Bharat / state

मुंबईत अडकलेले ते 1200 कामगार ओडिशाकडे रवाना

author img

By

Published : May 12, 2020, 7:04 PM IST

मुंबईच्या पूर्व उपनगरातील माहुल परिसरात मोठ्या प्रमाणात ओडिशाच्या कामगारांची वस्ती आहे. येथील रिफायनरीमध्ये रोजंदारीवर काम करणारे 1200 कामगार हे ओडिशाच्या बेहरामपूर जिल्ह्यातील आहेत. या कामगारांवर लॉकडाऊनमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती.

कामगार
कामगार

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत अडकलेले सुमारे 1200 ओडिशाचे मजूर आज आपल्या गावाकडे रवाना झाले. खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून, मुंबई ते ओडिशा विशेष रेल्वे मंगळवारी सांयकाळी 5 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघाली. खासदार राहुल शेवाळे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून या कामगारांना निरोप दिला. यावेळी नगरसेवक श्रीकांत शेट्ये, पोलीस अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील माहुल परिसरात मोठ्या प्रमाणात ओडिशाच्या कामगारांची वस्ती आहे. येथील रिफायनरीमध्ये रोजंदारीवर काम करणारे 1200 कामगार हे ओडिशाच्या बेहरामपूर जिल्ह्यातील आहेत. या कामगारांवर लॉकडाऊनमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे आपल्या मूळ गावी परतण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते. या कामगारांची व्यथा स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी सरकार दरबारी मांडली. खासदार शेवाळे यांच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या समन्वयातून या कामगारांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करून त्यांना आपल्या राज्याकडे रवाना करण्यात आले.

गेल्या दीड महिन्यांपासून बेकारीमुळे हवालदिल झालेल्या या कामगारांना जेवणाची पाकिटे आणि सुरक्षा किट यांची व्यवस्थाही खासदार शेवाळे यांच्यामार्फत करण्यात आली होती. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचे मोठे आव्हान आजमितीला केंद्र आणि राज्य सरकारसमोर उभे आहे. या 1200 कामगारांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया
खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईत अडकलेले सुमारे 1200 ओडिशाचे मजूर आज आपल्या गावाकडे रवाना झाले. खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नाने राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून, मुंबई ते ओडिशा विशेष रेल्वे मंगळवारी सांयकाळी 5 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघाली. खासदार राहुल शेवाळे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून या कामगारांना निरोप दिला. यावेळी नगरसेवक श्रीकांत शेट्ये, पोलीस अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील माहुल परिसरात मोठ्या प्रमाणात ओडिशाच्या कामगारांची वस्ती आहे. येथील रिफायनरीमध्ये रोजंदारीवर काम करणारे 1200 कामगार हे ओडिशाच्या बेहरामपूर जिल्ह्यातील आहेत. या कामगारांवर लॉकडाऊनमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे आपल्या मूळ गावी परतण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून ते प्रयत्न करत होते. या कामगारांची व्यथा स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी सरकार दरबारी मांडली. खासदार शेवाळे यांच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या समन्वयातून या कामगारांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करून त्यांना आपल्या राज्याकडे रवाना करण्यात आले.

गेल्या दीड महिन्यांपासून बेकारीमुळे हवालदिल झालेल्या या कामगारांना जेवणाची पाकिटे आणि सुरक्षा किट यांची व्यवस्थाही खासदार शेवाळे यांच्यामार्फत करण्यात आली होती. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याचे मोठे आव्हान आजमितीला केंद्र आणि राज्य सरकारसमोर उभे आहे. या 1200 कामगारांसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया
खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.