ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Feb 1, 2020, 4:57 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार असल्याचे सांगितले असून, आमचे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

union budget 2020
शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

लातूर - अर्थसंकल्पाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाचला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणार, 20 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप, 15 लाख कोटींचे कर्ज अशा घोषणांची तरतुद शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या वेगळ्याच असून, हे सरकार आश्वासनांचे गाजर दाखवित असल्याचा आरोप लातूरमधील शेतकऱ्यांनी केला आहे. 'ईटीव्ही भारत'ने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा - देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री

दुप्पट उत्पन्न, अत्याधुनिक शेती व्यवसाय, झिरो बजेट यासारख्या घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र, हमीभाव, लातूरच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा यासारखे मुद्दे बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या रब्बी हंगामातील पीके टँकरच्या पाण्यावर जगवावी लागत आहेत. हरभाऱ्यासारख्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या बाजूचा नसल्याचे मत लातूरच्या शेतकऱ्यांनी मांडले आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्प : 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद

लातूर - अर्थसंकल्पाच्या सुरवातीलाच शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पाढा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाचला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणार, 20 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप, 15 लाख कोटींचे कर्ज अशा घोषणांची तरतुद शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या वेगळ्याच असून, हे सरकार आश्वासनांचे गाजर दाखवित असल्याचा आरोप लातूरमधील शेतकऱ्यांनी केला आहे. 'ईटीव्ही भारत'ने शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.

शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा - देशात २० लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार - अर्थमंत्री

दुप्पट उत्पन्न, अत्याधुनिक शेती व्यवसाय, झिरो बजेट यासारख्या घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही. मात्र, हमीभाव, लातूरच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा यासारखे मुद्दे बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या रब्बी हंगामातील पीके टँकरच्या पाण्यावर जगवावी लागत आहेत. हरभाऱ्यासारख्या पिकाला हमी भाव मिळत नसल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या बाजूचा नसल्याचे मत लातूरच्या शेतकऱ्यांनी मांडले आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्प : 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद

Intro:शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच ; अर्थसंकल्पात पोकळ आश्वासने
लातूर : अर्थसंकल्पाच्या सुरवातीलाच देशातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पाढा अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारमन यांनी वाचला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविणार, २०लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार, १५ लाख कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना देणार यासारखा १६कलमी कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी राबविणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या वेगळ्याच असून हे सरकार अश्वसनांचे गाजर दाखवीत असल्याचा आरोप लातूरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीने...


Body:दुप्पट उत्पन्न, अत्याधुनिक शेती व्यवसाय, झेरो बजेट यासारख्या घोषणा करण्याची ही काय पहिली वेळ नाही. मात्र, हमीभाव, पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटवावा यासारखे मुद्दे बाजूला ठेवले जात आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकेच टँकरच्या पाण्यावर जोपासावी लागत आहेत. हरभाऱ्याचा भाव कमी होत आहे. यासारख्या मुद्द्यांवर तोडगा न काढता आश्वासने दिले जात आहे. उत्पन्न वाढवा म्हणायचे आणि त्याच उत्पादनाला कवडीमोल दर द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांची लुबडणूक हे सरकारच करीत असल्याचा घणाघात लातूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे.


Conclusion:त्यामुळे अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा असल्या तरी ही केवळ पोकळ आश्वासने आहेत हेच खरे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.