ETV Bharat / state

दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील हणमंत राजेंद्र ढेंबरे (वय 38) वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. सततची नापिकी, सोसायटी आणि खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.

मृत हणमंत राजेंद्र ढेंबरे
author img

By

Published : Oct 27, 2019, 3:14 PM IST

लातूर - औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील हणमंत राजेंद्र ढेंबरे (वय 38) वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मृत ढेंबरे यांना एक एकर शेती असून त्यांच्यावर सोसायटीचे व खाजगी सावकाराचे कर्ज आहे. सततची नापिकी, सोसायटी आणि खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. हणमंत ढेंबरे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार मुली असे कुटुंब आहे.

हेही वाचा - लातुरात एका माकडाचा 100 जणांना चावा; जळकोटमध्ये माकडाची दहशत

या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश यादव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. वैजनाथ बळीराम विभूते यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

लातूर - औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील हणमंत राजेंद्र ढेंबरे (वय 38) वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मृत ढेंबरे यांना एक एकर शेती असून त्यांच्यावर सोसायटीचे व खाजगी सावकाराचे कर्ज आहे. सततची नापिकी, सोसायटी आणि खासगी सावकाराच्या तगाद्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. हणमंत ढेंबरे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार मुली असे कुटुंब आहे.

हेही वाचा - लातुरात एका माकडाचा 100 जणांना चावा; जळकोटमध्ये माकडाची दहशत

या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश यादव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. वैजनाथ बळीराम विभूते यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लातूर : औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील हणमंत राजेंद्र ढेंबरे या 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शनिवारी मध्यरात्री राहत्या घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.
Body:मयत ढेंबरे यांना अवघी 1 एकर शेती असून त्यांच्यावर सोसायटीचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. सततची नापिकी व सोसायटी, खाजगी सावकाराच्या तगाद्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. शनिवारी ही घटना घडली असून रविवारी सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार गणेश यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वैजनाथ बळीराम विभूते यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. Conclusion:त्यांच्या पश्चात आई, पत्नी व 4 मुली असा परिवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.