ETV Bharat / state

Panchganga River Floods : राधानगरी धरणाचे सात दराचे उघडले; पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर, सतेज पाटलांचे कर्नाटक मुख्यमंत्र्यांना पत्र

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी पत्र लिहिले आहे.

author img

By

Published : Jul 26, 2023, 5:12 PM IST

Panchganga River Floods
Panchganga River Floods
दीपक केसरकर, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पुराचे संकट निर्माण झाले आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून परिसरातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणही 100 टक्के भरले असल्याने धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी उद्या धोकादायक पातळी गाठणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील, यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग सुरू करण्याची विनंती केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र : राधानगरी धरणासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर उत्तरे दिली. धरण परिसरात दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत मी सभागृहात चर्चा देखील केली आहे,' असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा इशारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र आणखी दरवाजे उघडल्यास 2021 ची पूरस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळता येणार नाही. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थिती मांडणार आहे. अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनाही स्थलांतरित केले जात आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार लोकांना सतर्क केले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.


खबरदारी घेतली जाणार : स्वयंचलित ७ दरवाजे उघडल्याने राधानगरी धरणाच्या पाण्याची पातळी सहा फुटांनी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनर्थ घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोल्हापूचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. ज्यांची घरे पाण्याखाली गेली आहेत, त्यांचे स्थलांतर सुरू झाले असल्याची माहिती देखील केसरकर यांनी दिली आहे.

Letter from Satej Patil to Chief Minister of Karnataka
सतेज पाटील यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानपरिषदेत पुराचा प्रश्न : कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीबाबत सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे भीषण पूर येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीची बैठक झाली होती. यावर्षी अद्याप बैठक झाली नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीने तातडीने बैठक घेऊन अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

हेही वाचा - EXCLUSIVE REPORT : गेल्या वर्षी, याच दिवशी... कोल्हापुरातील महाप्रलयाच्या पाऊलखुणा

दीपक केसरकर, सतेज पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पुराचे संकट निर्माण झाले आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून परिसरातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच राधानगरी धरणही 100 टक्के भरले असल्याने धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी उद्या धोकादायक पातळी गाठणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील, यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र लिहून अलमट्टी धरणातून अधिकचा विसर्ग सुरू करण्याची विनंती केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र : राधानगरी धरणासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर उत्तरे दिली. धरण परिसरात दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. याबाबत मी सभागृहात चर्चा देखील केली आहे,' असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा इशारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. मात्र आणखी दरवाजे उघडल्यास 2021 ची पूरस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळता येणार नाही. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन परिस्थिती मांडणार आहे. अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनाही स्थलांतरित केले जात आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार लोकांना सतर्क केले जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.


खबरदारी घेतली जाणार : स्वयंचलित ७ दरवाजे उघडल्याने राधानगरी धरणाच्या पाण्याची पातळी सहा फुटांनी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोणताही अनर्थ घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोल्हापूचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. ज्यांची घरे पाण्याखाली गेली आहेत, त्यांचे स्थलांतर सुरू झाले असल्याची माहिती देखील केसरकर यांनी दिली आहे.

Letter from Satej Patil to Chief Minister of Karnataka
सतेज पाटील यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

विधानपरिषदेत पुराचा प्रश्न : कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीबाबत सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे भीषण पूर येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीची बैठक झाली होती. यावर्षी अद्याप बैठक झाली नाही. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांच्या समितीने तातडीने बैठक घेऊन अलमट्टी धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

हेही वाचा - EXCLUSIVE REPORT : गेल्या वर्षी, याच दिवशी... कोल्हापुरातील महाप्रलयाच्या पाऊलखुणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.