कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघामधील कालावधीत पदवीधरांचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले. पण, आता गेल्या दोन निवडणुका शिवसेनेच्या साथीला जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यावेळी शिवसेनेचे उणीव निश्चितच जाणवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द देत असतानाच भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटलांच्या कालावधीत पदवीधरांचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले - जयंत पाटील
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द देत असतानाच भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली.
कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे पदवीधर मतदारसंघामधील कालावधीत पदवीधरांचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच गेले. पण, आता गेल्या दोन निवडणुका शिवसेनेच्या साथीला जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यावेळी शिवसेनेचे उणीव निश्चितच जाणवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात महाविकास आघाडी सरकारचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी अरुण लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा शब्द देत असतानाच भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.