ETV Bharat / state

KCR on Sharad Pawar : 'आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणता, आता तुमचाच पक्ष...', केसीआर यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 1, 2023, 9:59 PM IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला भाजपाची 'बी' टीम म्हटले होते. याला केसीआर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुमचा पक्ष भाजपसोबत जातो याचा अर्थ काय? असे म्हणत राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचे केसीआर यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

KCR on Sharad Pawar
के चंद्रशेखर राव

पहा काय म्हणाले केसीआर

कोल्हापूर : तेलंगाणाच्या भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी चाचपणी सुरू आहे. आता बीआरएस भाजपाची 'बी' टीम आहे असे हिणवणारे शरद पवार यांची राष्ट्रवादीचं भाजपसोबत गेली, असा हल्लाबोल भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

'काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर' : महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरी शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

'सरकारला शेतकऱ्यांबाबत दया नाही' : तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, अशा सूचना भारत राष्ट्र समितीकडून राज्य सरकारला करण्यात आल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला. याकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले, अशी जळजळीत टीका केसीआर यांनी केली आहे.

'तिसऱ्या आघाडीचा विचार नाही' : देशात आता सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी 'इंडिया' असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. यावर केसीआर यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही त्यांच्यासोबत नाही. तिसरी आघाडी करण्याचाही विचार नाही. आम्ही लोकांना नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर जनताच निर्णय करेल, असे केसीआर म्हणाले.

'पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर' : काँग्रेसने देशावर पन्नास वर्षे राज्य केले. आता भारतीय जनता पक्ष दहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र लोकांच्या पदरी निराशा कायम आहे. आमच्या कामाची पद्धत पाहून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधला. राज्यात आतापर्यंत आम्ही 50 टक्के काम पूर्ण केले आहे. भारत राष्ट्र समितीचे 14 लाखांहून अधिक पदाधिकारी आहेत. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे केसीआर यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Modi and Pawar : 'काका' नेमके कोणासोबत? पवार-मोदी भेटीने INDIA चे नेते नाराज
  2. Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ, तर मोदींनी अजित पवारांची, मोदी-पवार बॉडीलँगवेजचा अर्थ काय?
  3. Sharad Pawar : देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक पुण्यात शिवाजी महाराजांनी केला - शरद पवार

पहा काय म्हणाले केसीआर

कोल्हापूर : तेलंगाणाच्या भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी चाचपणी सुरू आहे. आता बीआरएस भाजपाची 'बी' टीम आहे असे हिणवणारे शरद पवार यांची राष्ट्रवादीचं भाजपसोबत गेली, असा हल्लाबोल भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. के. चंद्रशेखर राव आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते.

'काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर' : महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रेसही फुटण्याच्या मार्गावर आहे. आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरी शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा मुद्दा गंभीर असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

'सरकारला शेतकऱ्यांबाबत दया नाही' : तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवा, अशा सूचना भारत राष्ट्र समितीकडून राज्य सरकारला करण्यात आल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला. याकडेही राज्य सरकारने दुर्लक्ष केले, अशी जळजळीत टीका केसीआर यांनी केली आहे.

'तिसऱ्या आघाडीचा विचार नाही' : देशात आता सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी 'इंडिया' असे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. यावर केसीआर यांनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही त्यांच्यासोबत नाही. तिसरी आघाडी करण्याचाही विचार नाही. आम्ही लोकांना नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर जनताच निर्णय करेल, असे केसीआर म्हणाले.

'पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर' : काँग्रेसने देशावर पन्नास वर्षे राज्य केले. आता भारतीय जनता पक्ष दहा वर्षांपासून सत्तेत आहे. मात्र लोकांच्या पदरी निराशा कायम आहे. आमच्या कामाची पद्धत पाहून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधला. राज्यात आतापर्यंत आम्ही 50 टक्के काम पूर्ण केले आहे. भारत राष्ट्र समितीचे 14 लाखांहून अधिक पदाधिकारी आहेत. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे केसीआर यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Modi and Pawar : 'काका' नेमके कोणासोबत? पवार-मोदी भेटीने INDIA चे नेते नाराज
  2. Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवारांनी थोपटली नरेंद्र मोदींची पाठ, तर मोदींनी अजित पवारांची, मोदी-पवार बॉडीलँगवेजचा अर्थ काय?
  3. Sharad Pawar : देशातला पहिला सर्जिकल स्ट्राइक पुण्यात शिवाजी महाराजांनी केला - शरद पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.