ETV Bharat / state

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी - खासदार संभाजीराजे - कोल्हापूर खासदार संभाजीराजे

केंद्र आणि राज्य सरकारने यात कसलही राजकारण करू नये. जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. तरीही लॉकडाऊन करणार असाल तर, अनेक घटकांसाठी उपाययोजना आणल्या पाहिजेत.

संभाजीराजे
संभाजीराजे
author img

By

Published : Apr 13, 2021, 7:06 PM IST

Updated : Apr 13, 2021, 7:14 PM IST

कोल्हापूर - केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली पाहिजे. महाराष्ट्राला हा बोजा झेपणारा नाही. सर्वात जास्त बाधित राज्य महाराष्ट्र आहे. त्यामुळे बाकीच्या राज्यांसोबत महाराष्ट्रालाही मदत झाली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला केली आहे.

खासदार संभाजीराजे
संभाजीराजे यांनी सांगितले, की माणसाचे आयुष्य कोणत्याही पक्षाला बांधील नाही. राजकारण करायला वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने यात कसलही राजकारण करू नये. जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. तरीही लॉकडाऊन करणार असाल तर, अनेक घटकांसाठी उपाययोजना आणल्या पाहिजेत. पहिला लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. दुसरा फटका त्यांना बसला तर ते बाहेर पडू शकणार नाहीत, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले आहे. हेही वाचा-'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'

कोल्हापूर - केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत केली पाहिजे. महाराष्ट्राला हा बोजा झेपणारा नाही. सर्वात जास्त बाधित राज्य महाराष्ट्र आहे. त्यामुळे बाकीच्या राज्यांसोबत महाराष्ट्रालाही मदत झाली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला केली आहे.

खासदार संभाजीराजे
संभाजीराजे यांनी सांगितले, की माणसाचे आयुष्य कोणत्याही पक्षाला बांधील नाही. राजकारण करायला वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने यात कसलही राजकारण करू नये. जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. तरीही लॉकडाऊन करणार असाल तर, अनेक घटकांसाठी उपाययोजना आणल्या पाहिजेत. पहिला लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. दुसरा फटका त्यांना बसला तर ते बाहेर पडू शकणार नाहीत, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले आहे. हेही वाचा-'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'
Last Updated : Apr 13, 2021, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.