जालना: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद मिटवावा आणि मगच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करावं, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. जालना जिल्ह़्यातल्या घनसावंगीत आज मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकास्त्र: उद्या पंतप्रधान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. तुम्ही देशाचे पालक आहात तर पालकासारखं राहावं. आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर बोलावं आणि मगच या महामार्गाचं उद्घाटन करावं, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी भीकच मागावी, असे म्हणत चंद्रकांत पाटलांवरही टीका केली आहे. त्याचबरोबर आमच्या दैवतांचा कुणी अपमान करणार असाल, तर ते सहन करणार नाही.
समृद्धी महामार्गाचं उद्घाटन: पंतप्रधांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर पांघरून घालू नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर देखील त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद मिटवावा आणि मगच समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करावं असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. जालना जिल्ह़्यातल्या घनसावंगीत आज मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होेते.