ETV Bharat / state

तळपत्या उन्हातही कर्तव्यासाठी तत्पर वाहतूक पोलीस; सावलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाढत्या तापमानामुळे शहरात विविध ठिकाणी रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना देखील कुठल्या ना कुठल्यातरी सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. अंबड चौफुलीवर प्रवाशांना कुठलाच आधार न मिळाल्यामुळे बंद पडलेल्या सिग्नलच्या सावलीत उभा राहून प्रवाशांनी उन्हाची तीव्रता कमी केली. दुचाकी आणि उघड्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या सुमारे ९० टक्के प्रवासी कान आणि डोक्याला रुमाल बांधूनच प्रवास करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर शाळकरी मुले देखील संपूर्णपणे उन्हापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत.

author img

By

Published : Apr 27, 2019, 5:34 PM IST

तापमान वाढीचा फटका


जालना - शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पारा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. या मोसमातील सर्वात जास्त तापमान आज नोंदविले गेले. शुक्रवारी हे तापमान ४३.१ नोंदवले गेले होते होते. आज वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी सकाळी १० वाजण्यापूर्वीच बाहेरील कामे करण्याला प्राध्यान दिल्याचे दृश्य शहरात दिसत होते. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भर उन्हामध्ये आपले कर्तव्य निभावल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.

तापमान वाढ

उद्या रविवारी लग्नतिथी आहे, त्यातच सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या मनात नसतानाही घराच्या बाहेर पडावे लागले. त्यामुळे एवढ्या तापमानातही शहरांमध्ये तुरळक वाहतूक होती. मात्र, या वाहतुकीशी सबंध असलेल्या आणि लग्नाच्या मुहूर्ताची काही देणेघेणे नसले तरी आपले कर्तव्य निभावणे हा एकमेव उद्देश असलेल्या शहर वाहतूक पोलिसांसाठी मात्र उन्हाळा जीवघेणा ठरत आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूक पोलिसांसाठी निवारा केलेला आहे. मात्र, या निवाऱ्यावरील छतच बाजूला काढून टाकले असल्यामुळे हे निवारा अडचण ठरत आहे. त्यामुळे भर उन्हामध्ये शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना डोक्यावर टोपी आणि कानाला रुमाल बांधून आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. या सर्व दृश्यावरून दुसऱ्यांना सुरक्षिततेसाठी काळजी घेणाऱ्या या शहर वाहतूक पोलिसांची प्रशासनकडून मात्र काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.


उन्हापासून बचावासाठी सावलीचा आधार -


वाढत्या तापमानामुळे शहरात विविध ठिकाणी रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना देखील कुठल्या ना कुठल्यातरी सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. अंबड चौफुलीवर प्रवाशांना कुठलाच आधार न मिळाल्यामुळे बंद पडलेल्या सिग्नलच्या सावलीत उभा राहून प्रवाशांनी उन्हाची तीव्रता कमी केली. दुचाकी आणि उघड्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या सुमारे ९० टक्के प्रवासी कान आणि डोक्याला रुमाल बांधूनच प्रवास करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर शाळकरी मुले देखील संपूर्णपणे उन्हापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत.


जालना - शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पारा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. या मोसमातील सर्वात जास्त तापमान आज नोंदविले गेले. शुक्रवारी हे तापमान ४३.१ नोंदवले गेले होते होते. आज वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी सकाळी १० वाजण्यापूर्वीच बाहेरील कामे करण्याला प्राध्यान दिल्याचे दृश्य शहरात दिसत होते. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भर उन्हामध्ये आपले कर्तव्य निभावल्याचे दृश्य यावेळी दिसून आले.

तापमान वाढ

उद्या रविवारी लग्नतिथी आहे, त्यातच सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या मनात नसतानाही घराच्या बाहेर पडावे लागले. त्यामुळे एवढ्या तापमानातही शहरांमध्ये तुरळक वाहतूक होती. मात्र, या वाहतुकीशी सबंध असलेल्या आणि लग्नाच्या मुहूर्ताची काही देणेघेणे नसले तरी आपले कर्तव्य निभावणे हा एकमेव उद्देश असलेल्या शहर वाहतूक पोलिसांसाठी मात्र उन्हाळा जीवघेणा ठरत आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूक पोलिसांसाठी निवारा केलेला आहे. मात्र, या निवाऱ्यावरील छतच बाजूला काढून टाकले असल्यामुळे हे निवारा अडचण ठरत आहे. त्यामुळे भर उन्हामध्ये शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना डोक्यावर टोपी आणि कानाला रुमाल बांधून आपले कर्तव्य निभवावे लागत आहे. या सर्व दृश्यावरून दुसऱ्यांना सुरक्षिततेसाठी काळजी घेणाऱ्या या शहर वाहतूक पोलिसांची प्रशासनकडून मात्र काळजी घेतली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.


उन्हापासून बचावासाठी सावलीचा आधार -


वाढत्या तापमानामुळे शहरात विविध ठिकाणी रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना देखील कुठल्या ना कुठल्यातरी सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. अंबड चौफुलीवर प्रवाशांना कुठलाच आधार न मिळाल्यामुळे बंद पडलेल्या सिग्नलच्या सावलीत उभा राहून प्रवाशांनी उन्हाची तीव्रता कमी केली. दुचाकी आणि उघड्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या सुमारे ९० टक्के प्रवासी कान आणि डोक्याला रुमाल बांधूनच प्रवास करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर शाळकरी मुले देखील संपूर्णपणे उन्हापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत.

Intro:जालना शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून आज किमान 28 . 8 तर कमाल 43.2 म्हणजे जवळपास 44 अंश सेल्सिअस असे सर्वात जास्त तापमान आज नोंदविले गेले. काल हे तापमान 43 .1 एवढे होते .(पहाटे साडेचार ते साडेपाच दरम्यान घेतलेले तापमान म्हणजे किमान ,आणि दुपारी दीड ते चार वाजेच्या दरम्यान घेतलेले तापमान म्हणजे कमाल)आज वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांनी पहाटे दहा वाजेच्या आत घराबाहेरील कामे करणे पसंत केले .दुपारी चार वाजेच्या सुमारास बहुतांश रस्त्यांवर सन्नाटा पसरलेला होता .अशाही परिस्थितीत शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मात्र भर उन्हामध्ये आपले कर्तव्य निभावले . वाढत्या तापमानामुळे तापमानापासून सुटकारा देणाऱ्य शितपेयाच्या मागणीत वाढ झाली आहे.


Body:उद्या रविवारी लग्नतिथी आहे त्यातच सुट्टीचा दिवस असल्यामुळे नागरिकांच्या मनात नसतानाही घराच्या बाहेर पडावे लागले. त्यामुळे एवढ्या तापमानातही शहरांमध्ये तुरळक वाहतूक होती. मात्र या वाहतुकीशी सबंध असलेल्या आणि लग्नाच्या मुहूर्ताची काही देणेघेणे नसले तरी आपले कर्तव्य निभावणे हा एकमेव उद्देश असलेल्या शहर वाहतूक पोलिसांसाठी मात्र उन्हाळा जीवघेणा ठरत आहे .शहराच्या मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूक पोलिसांसाठी निवारा केलेला आहे ,मात्र या निवाऱ्यावरील छतच बाजूला काढून टाकले असल्यामुळे हे निवारे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत. त्यामुळे भर उन्हामध्ये शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना डोक्यावर टोपी आणि कानाला रुमाल बांधून आपले कर्तव्य निभाव लागत आहे .त्यामुळे दुसऱ्यांना सुरक्षिततेसाठी आणि दुसऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या या शहर वाहतूक पोलिसांची प्रशासन काळजी घेण्यासाठी तयार नसल्याचे चित्र समोर आहे.
वाढत्या तापमानामुळे शहरात विविध ठिकाणी ऑटोरिक्षा ची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना देखील कुठल्या ना कुठल्यातरी सावलीचा आधार घ्यावा लागत आहे .अंबड चौफुलीवर प्रवाशांना कुठलाच आधार न मिळाल्यामुळे बंद पडलेल्या सिग्नलच्या सावलीत उभा राहून प्रवाशांनी उन्हाची तीव्रता कमी केली. दुचाकी आणि उघड्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या सुमारे 90 टक्के प्रवाशांनी कानाला आणि डोक्याला बांधूनच प्रवास करताना दिसत आहेत ,एवढेच नव्हे तर शाळकरी मुले देखील संपूर्णपणे उन्हापासून बचाव करण्यासाठी सुरक्षेची ची काळजी घेताना दिसत आहेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.