ETV Bharat / state

शरद पवारांच्या मुखात राम तर बगलेत सुरी; सदाभाऊ खोत यांची जळगावात घणाघाती टीका

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:46 PM IST

उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) जळगावात शरद पवारांवर टीका केली.

c
c

जळगाव - उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) जळगावात शरद पवारांवर टीका केली.

बोलताना सदाभाऊ खोत

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या. केंद्र सरकारने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारला लक्ष्य केले.

शरद पवारांची भूमिका दुटप्पी

सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत 2005 मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तीनही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीने घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आराेप सदाभाऊ खाेत यांनी केला. कृषी कायद्यांच्या विराेधात काल भारत बंद पुकारण्यात आला हाेता. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून 70 वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केल्याचेही खाेत म्हणाले.

शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात पवार माहीर

शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

एफआरपीसाठी लवकरच आंदाेलन

राज्य सरकारची एफआरपीबाबत असलेली भूमिका दुटप्पी आहे. याबाबत आम्ही लवकरच एल्गार पुकारणाऱ्या आहोत. एफआरपीच्या मुद्द्यावरून आम्ही लवकरच साखर आयुक्तालयासमाेर निदर्शने करणार आहोत. हा मुद्दा केंद्राकडेही प्राधान्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री जनतेला टोप्या घालताहेत

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जनतेला टोप्या घालण्याचे काम करत आहेत. राज्य सरकारने आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द केली. त्यामुळे हजारो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. राज्य सरकारने ऐनवेळी खासगी कंपनीला ही परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले होते. त्याची टक्केवारी ठरलेली नसल्यानेच राज्य सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचे पाप केल्याचा आरोप खोत यांनी केला. आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार असून, आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल

जळगाव - उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) जळगावात शरद पवारांवर टीका केली.

बोलताना सदाभाऊ खोत

पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या. केंद्र सरकारने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे, उसाची एफआरपी, आरोग्य विभागाचा कारभार अशा विविध विषयांवर त्यांनी मते मांडत राज्य सरकारला लक्ष्य केले.

शरद पवारांची भूमिका दुटप्पी

सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत 2005 मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले 3 नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तीनही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीने घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आराेप सदाभाऊ खाेत यांनी केला. कृषी कायद्यांच्या विराेधात काल भारत बंद पुकारण्यात आला हाेता. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून 70 वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केल्याचेही खाेत म्हणाले.

शेतकऱ्यांचा खजिना लुटण्यात पवार माहीर

शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

एफआरपीसाठी लवकरच आंदाेलन

राज्य सरकारची एफआरपीबाबत असलेली भूमिका दुटप्पी आहे. याबाबत आम्ही लवकरच एल्गार पुकारणाऱ्या आहोत. एफआरपीच्या मुद्द्यावरून आम्ही लवकरच साखर आयुक्तालयासमाेर निदर्शने करणार आहोत. हा मुद्दा केंद्राकडेही प्राधान्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री जनतेला टोप्या घालताहेत

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जनतेला टोप्या घालण्याचे काम करत आहेत. राज्य सरकारने आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द केली. त्यामुळे हजारो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. राज्य सरकारने ऐनवेळी खासगी कंपनीला ही परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले होते. त्याची टक्केवारी ठरलेली नसल्यानेच राज्य सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचे पाप केल्याचा आरोप खोत यांनी केला. आरोग्य विभागाचा हा गलथान कारभार असून, आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली.

हेही वाचा - VIDEO : पाचोऱ्यात हिवरा नदीच्या पुरात तरूण गेला वाहून; जळगावात SDRFची टीम दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.