ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाला अतिवृष्टीचा फटका; फक्त 13 टक्के पेरण्या पूर्ण - जळगाव रब्बी हंगाम पेरणी

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होते. खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची काढणी झाल्यानंतर रिकामे झालेल्या शेतांमध्ये  ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी होते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी पेरणी करतात.

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाला अतिवृष्टीचा फटका
जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाला अतिवृष्टीचा फटका
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:54 AM IST

जळगाव - यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. डिसेंबर सुरू झाला तरी जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी फक्त 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रावर ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाला अतिवृष्टीचा फटका


जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होते. खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची काढणी झाल्यानंतर रिकामे झालेल्या शेतांमध्ये ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी होते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी पेरणी करतात.

हेही वाचा - मांजरीने भ्रूण खाल्ले, केईएम प्रशासनाचे खात्यांतर्गत चौकशीचे आदेश


मात्र, यावर्षी पाऊस लांबल्याने शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मशागत करता आली नाही. तब्बल एक ते दीड महिना उशिराने शेतकरी ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी होत आहेत. डिसेंबर महिन्याला सुरुवात होऊनही फक्त 13 टक्के म्हणजेच अवघ्या 20 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. थंडीचा जोर अजूनही वाढत नसल्याने रब्बी हंगामातील गहू पेरणीला हवा तसा वेग आलेला नाही.


अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात वाया गेला मात्र, त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाली आहे. नद्या, नाले आणि विहिरींना पाणी असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होणार आहे. पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी जळगाव जिल्ह्यात रब्बी ज्वारीसह कांद्याचेही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात गिरणा, तापी, वाघूर नदी प्रदेशात टरबूज आणि खरबूज लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांना आहे.


यावर्षी कापूस पिकावर काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची फरदड (कापसाचा उशिरा निघणारा माल) घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जळगाव - यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. डिसेंबर सुरू झाला तरी जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी फक्त 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रावर ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांची पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाला अतिवृष्टीचा फटका


जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होते. खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची काढणी झाल्यानंतर रिकामे झालेल्या शेतांमध्ये ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची पेरणी होते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी पेरणी करतात.

हेही वाचा - मांजरीने भ्रूण खाल्ले, केईएम प्रशासनाचे खात्यांतर्गत चौकशीचे आदेश


मात्र, यावर्षी पाऊस लांबल्याने शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मशागत करता आली नाही. तब्बल एक ते दीड महिना उशिराने शेतकरी ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी होत आहेत. डिसेंबर महिन्याला सुरुवात होऊनही फक्त 13 टक्के म्हणजेच अवघ्या 20 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. थंडीचा जोर अजूनही वाढत नसल्याने रब्बी हंगामातील गहू पेरणीला हवा तसा वेग आलेला नाही.


अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात वाया गेला मात्र, त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाली आहे. नद्या, नाले आणि विहिरींना पाणी असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होणार आहे. पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी जळगाव जिल्ह्यात रब्बी ज्वारीसह कांद्याचेही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात गिरणा, तापी, वाघूर नदी प्रदेशात टरबूज आणि खरबूज लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांना आहे.


यावर्षी कापूस पिकावर काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची फरदड (कापसाचा उशिरा निघणारा माल) घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Intro:जळगाव
चालू वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उगवला असला, तरी जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाची केवळ 13 टक्के पेरणी झाली आहे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रावर ज्वारी, हरभरा आणि गहू पेरणी सुरू आहे. खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे.Body:जळगाव जिल्ह्यात दरवर्षी एकूण साडेसात लाख हेक्टर क्षेत्रापैकी दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होते. खरीप हंगामातील ज्वारी, उडीद, मूग, भुईमूग या पिकांची काढणी झाल्यानंतर रिकामे झालेल्या शेतांमध्ये मशागत केल्यावर रब्बीची कोरडवाहू ज्वारी, हरभरा पेरणी होते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही पेरणी शेतकरी करतात. मात्र, यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस लांबल्याने शेतांमध्ये वाफसा नव्हता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी मशागत करता आली नाही. आता तब्बल एक ते दीड महिना उशिराने शेतकरी ज्वारी, हरभरा पेरत आहेत. डिसेंबर महिन्याला सुरुवात होऊनही आजअखेर केवळ 13 टक्के म्हणजेच अवघ्या 20 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुसरीकडे, थंडीचा जोर अजूनही वाढत नसल्याने रब्बी हंगामातील गहू पेरणीला हवा तसा वेग आलेला नाही. पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामावर खूप आशा आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात वाया गेला खरा; परंतु, कोरडा दुष्काळ हद्दपार होऊन पाण्याची उपलब्धता चांगली झाली आहे. नद्या, नाले तसेच विहिरींना पाणी असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामासाठी होणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्वारी, हरभरा पेरण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. थंडीचे प्रमाण वाढल्यावर गहू पेरणीला वेग येईल. खरीप हंगामात ज्वारी, बाजरी तसेच मक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ज्वारी तसेच मका पेरत आहेत. पाणी उपलब्ध असल्याने यावर्षी जळगाव जिल्ह्यात रब्बी ज्वारीसह कांद्याचेही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुढच्या काळात गिरणा, तापी, वाघूर नदी प्रदेशात टरबूज आणि खरबूज लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांना आहे.Conclusion:यावर्षी कापूस पिकावर काही प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची फरदड (कापसाचा उशिरा निघणारा माल) घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे. हे आवाहन लक्षात घेता तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा म्हणून जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी रब्बी हंगामात ज्वारी, मका पेरणीवर अधिक भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बाईट: अनंत चौधरी, शेतकरी (पांढरा शर्ट)
अक्षय मिश्रा, शेतकरी (गळ्यात रुमाल)
अनिल भोकरे, कृषी उपसंचालक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.