ETV Bharat / state

आम्ही कुस्ती खेळतो ती विरोधकांना पाडण्यासाठीच; यशपाल भिंगेंचा अशोक चव्हाणांना इशारा

आमच्याकडे पैसा,भांडवल आणि यंत्रणा नसली तरी कार्यकर्त्यांच्या जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्रात वंचितांचे सरकार येणार असल्याचे यशपाल भिंगे यांनी सांगितले.

author img

By

Published : Sep 11, 2019, 10:52 PM IST

यशपाल भिंगे

हिंगोली- युतीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अजूनही प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांना हे माहीत असावं की, आम्ही जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो ते कुस्ती हरण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच उतरतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक यशपाल भिंगे यांनी केले. सत्ता संपादन महारॅलीसाठी ते हिंगोलीमध्ये आले होते.

यशपाल भिंगे, नेते वंचित बहुजन आघाडी

आम्ही ताकतीने लढणार आहोत, या मध्ये अजिबात गैर नाही. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीला जनतेचा प्रतिसाद बघता आमचे सरकार निश्चित येणार आहे. तसेच आम्ही एकमेकांचे शत्रू तर अजिबात नाहीत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसेच आमच्याकडे पैसा नाही कुठलेही भांडवल नाही आणि यंत्रणा देखील नाही. हे सर्व जरी नसले तरीही राजकिय भूमिकेवर ठाम राहून प्रतिस्पर्धीला घायाळ करणार, चित्त करणार हे आमचं अंतिम ध्येय आहे, असे यशपाल भिंगे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला जनतेचा आम्हाला असलेला प्रतिसादावरुन आम्ही सत्तेत येणार असल्याचे भिंगे यांनी सांगितले.

महारॅलीत सहभागी असलेले पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. एमआयएम पेक्षा ही जास्त मुस्लिम नेते विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वंचितच्या जोरावर खासदार झालेल्या इम्प्तीयाज जलील यांनीही हे लक्षात ठेवायला हवे. असा टोला पाटील यांनी लगावला.

हेही वाचा-वंचित बहुजन आघाडीतर्फे 'वंचित वारकरी सन्मान यात्रेचा' शुभारंभ

विचारांच्या जोरावर असलेली असलेली ही लढाई आम्ही जिंकू, असे देखील पाटील यांनी सांगितले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नवे चेहरे सहभागी झाले होते. वंचित कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नवीन चेहरे अण्णाराव पाटील उमेदवारीबद्दल काय बोलतात याकडे लक्ष ठेवून होते.

हिंगोली- युतीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अजूनही प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांना हे माहीत असावं की, आम्ही जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो ते कुस्ती हरण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच उतरतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक यशपाल भिंगे यांनी केले. सत्ता संपादन महारॅलीसाठी ते हिंगोलीमध्ये आले होते.

यशपाल भिंगे, नेते वंचित बहुजन आघाडी

आम्ही ताकतीने लढणार आहोत, या मध्ये अजिबात गैर नाही. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीला जनतेचा प्रतिसाद बघता आमचे सरकार निश्चित येणार आहे. तसेच आम्ही एकमेकांचे शत्रू तर अजिबात नाहीत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसेच आमच्याकडे पैसा नाही कुठलेही भांडवल नाही आणि यंत्रणा देखील नाही. हे सर्व जरी नसले तरीही राजकिय भूमिकेवर ठाम राहून प्रतिस्पर्धीला घायाळ करणार, चित्त करणार हे आमचं अंतिम ध्येय आहे, असे यशपाल भिंगे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीला जनतेचा आम्हाला असलेला प्रतिसादावरुन आम्ही सत्तेत येणार असल्याचे भिंगे यांनी सांगितले.

महारॅलीत सहभागी असलेले पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. एमआयएम पेक्षा ही जास्त मुस्लिम नेते विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वंचितच्या जोरावर खासदार झालेल्या इम्प्तीयाज जलील यांनीही हे लक्षात ठेवायला हवे. असा टोला पाटील यांनी लगावला.

हेही वाचा-वंचित बहुजन आघाडीतर्फे 'वंचित वारकरी सन्मान यात्रेचा' शुभारंभ

विचारांच्या जोरावर असलेली असलेली ही लढाई आम्ही जिंकू, असे देखील पाटील यांनी सांगितले. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नवे चेहरे सहभागी झाले होते. वंचित कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नवीन चेहरे अण्णाराव पाटील उमेदवारीबद्दल काय बोलतात याकडे लक्ष ठेवून होते.

Intro:युतीच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण अजूनही प्रयत्नात आहेत. मात्र त्याना हे माहीत असावं की, आम्ही जेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानात उतरतो ते कुस्ती हरण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच उतरत असल्याचे वक्तव्य हिंगोली येथे सत्ता संपादन महारॅलीत आलेले वंचीत बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हापक्ष निरीक्षक यशपाल भिंगे यांनी केले.


Body:आम्ही ताकतीने लढणार आहोत, या मध्ये अजिबात गैर नाही. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीला जनतेचा प्रतिसाद बघता आमचे सरकार निश्चित येणार आहे. तसेच आम्ही एक मेकांचे शत्रू तर अजिबात नाहीत. आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तसेच आमच्याकडे नाही पैसा नाही कुठलं भांडवल, तसेच यंत्रणा देखील नाही. हे सर्व जरी नसले तरीही राजकिय भूमिकेवर ठाम राहून प्रतिस्पर्धीला घायाळ करणार, चित्त करणार हे आमचं अंतिम ध्येय असल्याचे भिंगे यांनी सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीला जनतेचा असलेला प्रतिसाद यावरूनच आम्हाला आम्ही सत्येत येणार असल्याचे भिंगे यांनी सांगितले. तर रॅलीत सहभागी असलेले पार्लमेंट बोर्डाचे चेअरम यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर पत्रकार परिषदेत एम आय एम पेक्षा ही जास्त विधानसभेसाठी मुस्लिम नेते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने त्याना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच वंचितच्या जोरावर खासदार झालेल्या इम्प्तीयाज जलीलनेही लक्षात ठेवायला आल्याचा टोला पाटील यांनी लगावला.


Conclusion:विचारांच्या जोरावर असलेली असलेली ही लढाई आम्ही जिंकून टाकू असे देखील पाटील यांनी सांगितले. रॅली मध्ये मोठ्या संख्येने नवे चेहरे सहभागी झाले होते. वंचित कडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले नवीन चेहरे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पहावयास मिळाले, नवीन असलेल्या चेहऱ्यांना अण्णाराव पाटील उमेदवारीवर काहीतरी बोलतील याकडे ते लक्ष ठेवून होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.