ETV Bharat / state

हिंगोलीतील नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी गर्दी, ५ लाखाच्यावर भाविकांनी घेतले दर्शन

संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात.

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:48 PM IST

नामदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हिंगोली - संत नामदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून आतापर्यंत ५ लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी संस्थेच्यावतीने दर्शन रांगा बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर पंजाबमधून शीख बांधव देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आज याठिकाणी पायदळी दिंड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या, सोबतच हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जिल्ह्यात २ ते ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसात देखील भाविक नामदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले.

परत वारी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी अतिशय मोठा उत्सव असतो. त्यामुळे मंदिर संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासूच परतवारीची तयारी सुरू केली होती. पावसाचे वातावरण असल्याने दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांची पावसामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून जागोजागी टिन पत्राची ही व्यवस्था केली होती.

पहाटेच्या सुमारास आज संत नामदेवांची पूजा करुन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली - संत नामदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी गावात नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त भाविकांनी गर्दी केली आहे. पहाटेपासून आतापर्यंत ५ लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी संस्थेच्यावतीने दर्शन रांगा बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले.

संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर पंजाबमधून शीख बांधव देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आज याठिकाणी पायदळी दिंड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या, सोबतच हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जिल्ह्यात २ ते ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, पावसात देखील भाविक नामदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले.

परत वारी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी अतिशय मोठा उत्सव असतो. त्यामुळे मंदिर संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासूच परतवारीची तयारी सुरू केली होती. पावसाचे वातावरण असल्याने दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांची पावसामुळे गैरसोय होऊ नये, म्हणून जागोजागी टिन पत्राची ही व्यवस्था केली होती.

पहाटेच्या सुमारास आज संत नामदेवांची पूजा करुन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:संत नामदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसी नामदेव येथील नामदेवाच्या दर्शनासाठी परतवारी निमित्त भाविकांची मांदियाळी दिसून आली. जवळपास पहाटेपासून आतापर्यंत पाच लाखाच्यावर भाविकांनी दर्शन घेतले. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे दर्शन व्हावे यासाठी संस्थाच्या वतीने दर्शन रांगा बनविण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. भविकांची संख्याने मंदिर परिसरात भक्तीमय वातावर निर्माण झाले आहे.


Body:संत नामदेवाची जन्मभूमी असलेले नरसी नामदेव हे सर्वदूर प्रसिद्ध आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक आषाढी एकादशी आणि परत वारीनिमित्त आवर्जून दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर पंजाब मधून शीख बांधव देखील या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे पायदळी दिंड्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या, सोबतच हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसात देखील भाविक नामदेवाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावत असल्याचे पहावयास मिळाले. परत वारी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी अतिशय मोठा उत्सव असतो हा उत्सव भाविक अजिबात विसरूच शकत नाहीत. मंदिर संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीच्या दिवशीच्या दुसर्या दिवसापासूच परतवारीची तयारी सुरू केली होती. पावसाचे वातावरण असल्याने दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांची पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून, जागोजागी टिन पत्राची ही व्यवस्था केली होती.


Conclusion:पहाटेच्या सुमारास संत नामदेवांची पूजा केली अन नंतर भाविकांसाठी दर्शन कुले करुन दिले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, समिती अध्यक्ष रामेश्वर शिंदे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



व्हिज्युअल ftp केले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.