ETV Bharat / state

ईव्हीएम हटाव देश बचाव; वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर घंटानाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचावचा'' नारा देण्यात येत आहे.

author img

By

Published : Jun 17, 2019, 7:34 PM IST

वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर घंटानाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचावचा'' नारा देण्यात येत आहे. हे अनोखे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातही करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर दिवसभर घंटानाद करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन


ईव्हीएम ही मशीन असून ती हॅक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर घंटानाद केला. यावेळी 'ईव्हीएम हटाव देश बचाव'च्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर घंटानाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचावचा'' नारा देण्यात येत आहे. हे अनोखे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातही करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर दिवसभर घंटानाद करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

वंचित बहुजन आघाडीचे घंटानाद आंदोलन


ईव्हीएम ही मशीन असून ती हॅक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर घंटानाद केला. यावेळी 'ईव्हीएम हटाव देश बचाव'च्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Intro:संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटा नाद करून ''ईव्हीएम हटाव देश बचाव चा'' नारा देत निवडणूक विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहूजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर घंटा नाद सुरू केलाय. दिवसभर सुरू असलेल्या घंटा नाद मुळे सर्वांच्या नजरा खिळून घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे निदान पुढील होणाऱ्या निवडणुका तरी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर ने घेण्यात याव्यात. जेणेकरून या सरकारची असलियत उघड होण्यास मदत मिळेल.


Body:या घंटा नाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. दिवसभर घंटानाद सुरू होता. तर ईव्हीएम हटाव देश बचाव च्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. या ईव्हीएम मुळे, संपूर्ण घोळ होत असून, कोणतेही यंत्र हॅक करता येते मग मशीन करता येऊ शकत नाही हे कशावरून? असा सवाल वंचित बहुजन चे कार्यकर्ते सरकारला विचारत आहेत. तसेच ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन बनविली गेली त्याठिकाणी या मशीनचा वापरण्यात केलेला नाही. मात्र त्याच ईव्हीएमचा आधार घेत सरकारने निवडणुकात जिंकली.


Conclusion:दिवसभर सुरू असलेल्या घंटानाद मुळे जिल्हा कचरी परिसर चांगलाच दणाणून गेलाय. अशाच ईव्हीएमवर निवडणुका सुरू राहिल्यास तेच ते सरकार सत्तेत येत राहील. जे की यामुळे आपल्या भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच ईव्हीएम मशीन हटवून यापुढील निवडणुका ह्या पेपरच घेण्यात याव्यात हीच मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे पोहोवली.


जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख यांच्या बाईट
ज्योतिपाल रणवीर

या दोघांचे बाईट आणि घटनाद चे व्हिज्युअल मोजो
,

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.