ETV Bharat / state

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात - टोकाई साखर कारखाना

टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.17नोव्हेंबर)ला बॉयलर प्रदीपन समारंभाचा कार्यक्रम पार पडला. गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे.
author img

By

Published : Nov 18, 2019, 1:50 PM IST

हिंगोली - टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.17नोव्हेंबर)ला बॉयलर प्रदीपन समारंभाचा कार्यक्रम पार पडला. गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे.

वसमत परिसरात सर्वाधिक सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होते. यामुळे सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वसमतमध्ये आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहरातील दोन्ही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दर्जेदार ऊसाचे उत्पन्न निघणार असून त्याला चांगला भाव मिळणार असल्याचे चेअरमन जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी ऊसाला समाधानकारक भाव देण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यात आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बॉयलर अग्निप्रतिबंधक समारंभाची पूजा टोकाई कारखान्याचे संचालक गजानंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चेअरमन अॅड. शिवाजी जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली - टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.17नोव्हेंबर)ला बॉयलर प्रदीपन समारंभाचा कार्यक्रम पार पडला. गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

टोकाई साखर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे.

वसमत परिसरात सर्वाधिक सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड होते. यामुळे सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वसमतमध्ये आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहरातील दोन्ही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दर्जेदार ऊसाचे उत्पन्न निघणार असून त्याला चांगला भाव मिळणार असल्याचे चेअरमन जाधव यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी ऊसाला समाधानकारक भाव देण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यात आणावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बॉयलर अग्निप्रतिबंधक समारंभाची पूजा टोकाई कारखान्याचे संचालक गजानंद जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी चेअरमन अॅड. शिवाजी जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; टोकाईच्या चौथ्या गळीत हंगामास होणार प्रारंभ

हिंगोली- वसमत तालुक्यात सर्वाधिक जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या आहे. आता टोकाईच्या चौथ्या गळीत हंगामास प्रारंभ झाला असून, रविवारी बॉयलर प्रदीपन समारंभाचा कार्यक्रम आटोपलाय. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कारखान्यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे.


Body:बॉयलर अग्निप्रतिबंधक समारंभाची पूजा टोकाई कारखान्याचे संचालक गजानंद जाधव यांच्या हस्ते सपत्नीक झाले. तर अध्यक्षस्थानी चेअरम ऍड. शिवाजी जाधव यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. वसमत परिसर हा सर्वाधिक जास्त सिंचनाचा भाग असल्याने या भागांमध्ये शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात आता ऊस तोडणीच्या वेळेत टोकाई कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या भागात असलेल्या दोन्ही तलावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने ऊस दर्जेदार निघणार आहे त्याला भावही चांगल्या प्रकारे मिळणार असल्याचे चेअरमन जाधव यांनी सांगितले. यावर्षी मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णता कंबरडेच मोडले तर हाती आलेल्या सोयाबीनच्या मालातून शेतकऱ्याची पूर्णपणे स्वप्न भंगले आहेत. मात्र आता वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणी बाहेर काढण्यासाठी पाऊस मदतीचा ठरणार आहे. ऊसाला समाधानकारक भाव दिला जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तो काही कारखान्यात आणण्याचे आवाहन चेअरमन जाधव यांनी केलेय. खरंतर या टोकाई कारखान्या वरून वसमत तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. Conclusion:मात्र हा कारखाना दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता संजीवनी ठरणारअसला तरीही म उसाचे पैसे वेळेवर मिळावेत, ही अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत . एवढेच नव्हे तर या कारखान्याचा शेतकऱ्यांना आधार होणारच आहे त्याहूनही महत्वाचे म्हणजे रोजगार सर्वाधिक जास्त मिळणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.