ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस; खरीप पिकांना दिलासा

जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून कमी पर्जन्यमान होत आहे. यावर्षीची देखील परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच पाऊस जोरदार झालेत. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 2:04 PM IST

हिंगोली

हिंगोली - जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बळीराजा हा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होता. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, आज रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने सर्वच पिके टवटवीत दिसत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला होता. बँकेने कर्ज न दिल्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची आतापासून चिंता लागल्याचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस; खरीप पिकांना दिलासा

जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून कमी पर्जन्यमान होत आहे. यावर्षीची देखील परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच पाऊस जोरदार झालेत. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली आहे. परंतु, तब्बल पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके पूर्णतः सुकून जात होती. पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात शेतकरी पिकांना टँकरने पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. खासगी तसेच विविध बँकाकडून कर्ज घेऊन पेरणी केलेले शेतकरी चांगलेच निसर्गाच्या कोंडीत सापडलेले आहेत. मात्र, आज रिमझिम पावसाने का होईना शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हिंगोली - जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बळीराजा हा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होता. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, ते शेतकरी पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, आज रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने सर्वच पिके टवटवीत दिसत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला होता. बँकेने कर्ज न दिल्याने सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची आतापासून चिंता लागल्याचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस; खरीप पिकांना दिलासा

जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून कमी पर्जन्यमान होत आहे. यावर्षीची देखील परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच पाऊस जोरदार झालेत. त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली आहे. परंतु, तब्बल पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके पूर्णतः सुकून जात होती. पहाटेपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.

अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात शेतकरी पिकांना टँकरने पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. खासगी तसेच विविध बँकाकडून कर्ज घेऊन पेरणी केलेले शेतकरी चांगलेच निसर्गाच्या कोंडीत सापडलेले आहेत. मात्र, आज रिमझिम पावसाने का होईना शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Intro:जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज सकाळ पासून, जिल्ह्यातील विविध भागात रिमझिम पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. बळीराजा हा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत होता ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपड करत होते. मात्र आज रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने सर्वच पिके टवटवीत दिसत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला होता. बँकेने कर्ज न दिल्याने, सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची आतापासून चिंता लागल्याचे सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.


Body:हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षापासून आत्या अल्प पर्जन्यमान होत आहे. यावर्षीची देखील परिस्थिती गंभीरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच पाऊस जोरदार झालेत न त्यावरच शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी आटोपली खरे ! परंतु तब्बल पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके पूर्णतः सुकून जात होती. दुपारच्या वेळी तर एवढे ऊन तापत होते, त्यामुळे सुकून गेलेल्या पिकांकडे पाहण्याची देखील शेतकऱ्यांची ईच्छा नव्हती. मात्र उशिरा का होईना आज हजेरी लावलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना खरोखरच दिलासा मिळालाय. हळूहळू पावसाचा जोर वाढतच होता. पहाटे पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने, मॉर्निंग वाकला गेलेल्या नागरिकांची पावसापासून बचाव करण्यासाठी एकच धावपळ उडाली होती.


Conclusion:अजूनही शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात शेतकरी पिकांना स्प्रिंकंल द्वारे तर काही टँकरने पाणी देऊन पिके जगवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. खाजगी तसेच विविध बँकाकडून कर्ज घेऊन पेरणी केलेले शेतकरी चांगलेच निसर्गाच्या कोंडीत सापडलेले आहेत. मात्र आज रिमझिम पावसाळा का होईना शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.